Posts

Showing posts from August, 2021

लोकांच्या पाठीमागे चाला...

Image
"जो मूर्तिमंत धर्म बनून गेला. तो लहान बालकासारखाच होऊन जातो. मग त्याला विंचू दंश करीत नाही. जंगली पशू त्यावर झडप घालीत नाहीत. की,हिंस्त्र पक्षी त्याला चोच मारीत नाहीत !" ख-या ज्ञानाचा परिचय आपल्याला सदैव बालकाच्या नजरेतून जगाकडे पाहिले तरच होऊ शकतो.  असे सांगणारा लाओत्से आजन्म आपल्यातील लहान मुल जपू शकला.  असामान्य बुद्धिमत्ता आणि प्रतिभा लाभलेला लाओत्से बालकासारखा निरागस व निष्पाप होता.  वृद्धत्वातही त्याला आपले शैशव जपता आले.  लाओत्सेचे खरे नाव 'ली अर्ह' असे होते.  'ली' हे त्याचे आडनाव आणि 'अर्ह' हे त्याचे नावं.  असे असले तरी तो जगामध्ये लाओत्से नावाने ओळखला गेला.  लाओत्से याचा आणखी एक अर्थ आहे - प्राचीन गुरु,आचार्य अथवा तत्त्वज्ञ ! तसेच 'लाओ' म्हणजे शिक्षक.  या अर्थाने 'लाओत्से' हे विशेषण अथवा सन्मानदर्शक शब्द पदवीप्रमाणे या महान आचार्याला,धर्मसंस्थापकाला,तत्त्वज्ञाला जाणत्यांनी आदरपूर्वक बहाल केले होते.  लाओत्सेच्या शिकवणूकीनुसार माणसाने स्वतःला कायम अपरिचित अथवा अज्ञात ठेवले पाहिजे.  यासाठी त्याचे आणखी एक वचन महत्वाचे ठ

निग्रो मुक्तीची 'बीजं' पेरणारा बळीराजा

Image
"शेतकरी हे देशातील सर्वात सद्गुणी आणि स्वतंत्र नागरिक आहेत." असे विचार असणाऱ्या थॉमस जेफरसन यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसरा आणि अखेरचा कार्यकाळ १८०९ मध्ये संपुष्टात आला. नवीन राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया प्रारंभ झालेली होती. स्वांतत्र्यचा जाहीरनामा आणि अमेकरिकन संविधानाचा निर्माता असलेला थॉमस जेफरसन एक अजब रसायन होते. जीवनाच्या प्रवासात त्याने यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली असली तरी त्याच्यातील शेतकरी कायम जीवंत होता. इंग्लंडच्या संस्कृतीचा व जीवनशैलीचा प्रभाव असणारे जे अमेरिकन नागरिक होते त्यांच्या दृष्टीने जेफरसन गावंढळ माणूस होता. इंग्लंडच्या मातीतील कृत्रिम औपचारिकता आणि बेगडी शिष्टाचार यांना त्याच्या जीवनात कवडीचे स्थान नव्हते. ग्रामीण अमेरिकेचा भूमिपुत्र म्हणून असलेली भूमिका आणि आचरण त्यांन कधीच सोडले नाही. एवढेच नव्हे तर त्याची त्याला कधी खंत किंवा शरम देखील वाटली नाही. 'व्हाईट हाऊस' मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून राहत असतांना देखील तो ग्रामीण मोकळेढाकळेपणानेच जगला. साधे व सहज जीवन जगण्यावर त्याचा अतूट विश्वास होता. अमेरिकन राजदूत

'ताओ' चा प्रवासी...

Image
इसवी सन पूर्व सातव्या शतकाच्या अखेरची काळ होता.  चीनच्या 'छू' राज्यात 'कू' नावाचा राजा राज्य करत होता.  त्याच्या छू राज्यातील 'ली' जिल्हयातील एका गावात एक अक्रीत घडले.  गावातील एका महिलेला झोपेत एका धूमकेतूचे दर्शन झाले.  काहींच्या मते दिव्य प्रकाशाचे दर्शन झाले.  हा 'धूमकेतू' किंवा 'दिव्य प्रकाश' आपल्या गर्भात प्रवेश करत आहे.  अशी अनुभूती तिला आली. प्रसुतीनंतर तिने ज्या बालकाला जन्म दिला,त्याला पाहून तिच्यासह सर्वजण अचबिंत झाले.  हे बालक जन्माला आले तर जन्मतःच त्याच्या डोक्यावरचे केस पांढरे होते,चेहरा जख्ख वृद्धासारखा सुरकुत्यांनी भरलेला होता आणि पांढरी शुभ्र लांब दाढी होती.  तसेच त्याच्य कपाळावर चंद्र कलेची प्रतिमा आणि शरीरावर अनेक शुभ चिन्हं होती.  काही लोकांच्या मते जन्माच्या वेळी या बालकाचे वय ८२ वर्षे होते.  हे जन्माला आलेले बालकाचा जन्म मातेच्या एक्याऐंशी वर्षाच्या गर्भधारणेनंतर झाला होता.  असामान्यत्वाच्याही परिघा बाहेर असलेले हे बालक नेमके कोण होते? कोणाच्या जन्मासंदर्भातील ही अशी विचित्र कथा आहे ? असे प्रश्न आपल्या मनात निर्

अमेरिकन लोकशाहीतील फडांचा प्रारंभ

Image
थॉमस जेफरसन (Thomas Jefferson)  यांच्या अमेरिकेच्या (America) राष्ट्राध्यक्ष पदी निवडीच्या प्रक्रियेने निवडणूक आणि त्याच्यातील डावपेच-षडयंत्र यांचा प्रवेश अमेरिकन राजकारणात (American politics) झाला. जॉर्ज वॉशिंग्टन (George Washington) आणि जॉन ॲडम्स (John Adams) यांच्यापर्यंतचा काळ हा स्वातंत्र्य युद्ध आणि नव्याने मिळालेले स्वातंत्र्य यांनी भारावलेला होता. त्यामुळे वॉशिंग्टन आणि ॲडम्स यांची राष्ट्राध्यक्ष पदी निवडीसाठी झालेली निवडणूक प्रक्रिया ही केवळ औपचारिकता ठरली. थॉमस जेफरसन यांच्या निवडीच्या वेळी लोकशाहीतील सर्वात महत्वाच्या असणा-या निवडणूक प्रक्रियेचा खरा रंग दिसायला सुरवात झाली. वॉशिंग्टन आणि ॲडम्स यांच्याप्रमाणे थॉमस जेफरसन देखील अमेरिकेच्या राष्ट्रपित्यांमध्ये गणला जात असला तरी राष्ट्राध्यक्ष पद मिळवण्यासाठी त्याला चांगली झुंज दयावी लागली. वॉशिंग्टन सर्वसंमत्तीने तर ॲडम्स बहुमताने निवडले गेले. असे सौभाग्य जेफरसन यांच्या वाटयाला आले नाही. १८०० सालच्या अमेरिकेच्या तिस-या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणूकीत अशी काही गुंतागुंत झाली होती की त्यावर तोडगा निघेल. अशी कोणतीच शक्यत

कामीकडे जाण्यासाठी माकोतो

Image
"जा !माझ्या भव्य वंशजा ! तेथे जा आणि राज्य कर.  तुझ्या घराण्याची भरभराट होवो.  स्वर्ग व पृथ्वीप्रमाणे तुझा वंश अक्षय टिको." असा आशीर्वाद परमेश्वराने मिकाडोला देऊन त्याला पृथ्वीवर पाठवले.  परमेश्वराने पृथ्वी उत्पन्न करण्याची वेळी सर्वप्रथम जपान हे बेट उत्पन्न केले.  अशा जपानवर राज्य करण्यासाठी त्यांनी 'मिकाडो' नावाच्या व्यक्तीला राजा म्हणून हया भूमीवर पाठवले.  त्यामुळे शिंतो मान्यतेनुसार मिकाडो हा परमेश्वराचा म्हणजेच सूर्यदेवतेचा पृथ्वीवर आलेला पहिला वंशज ठरतो.  शिंतो धर्माच्या मान्यतेनुसार जपानचे राज्य व भूमी ही खास ईश्वरी योजनेने अस्तित्वात आली आहे.  ज्याप्रमाणे 'यहूदी-ख्रिश्चन-इस्लाम' यांच्या मान्यतेनुसार 'जेरूसलेम' किंवा 'इस्त्राइल' ची भूमी ईश्वराने त्याच्या आवडत्या मानवी समूहाला वास्तव्य करण्यासाठी दिलेली ईश्वरदत्त भूमी आहे.  त्याप्रमाणेच जपानी भूमी मिकाडोच्या वंशाला दिली होती.  त्याच्या घराण्यानेच जपानच्या भूमीवर हजारो वर्षे राज्य केले.  हा मिकाडो सूर्यादेवतेपासून म्हणजे 'अमातेरसू' किंवा 'ओहमी कामी' (सूर्यासाठी

देवांचा मार्ग शिंतो..

Image
जपानचा आद्य धर्म म्हणून 'शिंतो' चा उल्लेख केला जातो.  शिंतो शब्दाचा अर्थ 'देवांचा मार्ग' असा होतो.  आज शिंतोला धर्म संबोधले जात असले तरी ख-या अर्थाने तो धर्म नाही.  ती जपानी समाजाची प्राचीन जीवनप्रणाली किंवा जीवनशैली आहे.  शिंतोचा एकच असा धर्मसंस्थापक नाही.  त्यामध्ये एक ईश्वर संकल्पना आणि एक धर्मग्रंथ अस्तित्वात नाही.  म्हणजेच संस्थागत धर्मांच्या निकषांमध्ये शिंतोला आपण बसवू शकत नाही.  एवढेच नव्हे तर शिंतो हे त्याचे नामकरण इसवी सनाच्या सहाव्या शतकात करण्यात आले आहे.  ज्या जपानी जीवनशैली व संस्कृतीला आज शिंतो धर्म म्हणून ओळखले जाते.  तिच्या अस्तित्वाच्या खुणा इसवी सन पूर्व ६६० पासून उपलब्ध होतात.  इसवी सनाच्या सहाव्या शतकात जपानच्या धरतीवर बौद्ध धर्म पोहचल्यानंतर जपानी समाजाचा संस्थागत धर्म संकल्पनेशी परिचय झाला.  त्यामुळे आपण आजवर ज्या परंपरेचे,संस्कृतीचे,श्रद्धांचे आणि जीवनशैलीचे अनुकरण करत आलो.  तिचे अस्तित्व आणि वेगळेपण अधोरेखित करण्याची गरज जपानी लोकांना वाटली.  त्यामुळे त्यांनी आपल्या या परंपरेला शिंतो धर्म असे संबोधण्यास सुरवात केली.  त्यानंतर त्यांनी

कर्मयोगाचा महासागर : संत सांवता माळी

Image
"कांदा मुळा भाजी।अवघी विठाई माझी।", असे सांगणारे संत सांवता माळी हे भागवत संप्रदायाच्या मांदियाळीतील एक अनन्यसाधारण संत आहेत. आपल्या कर्मातच ईश्वराचा शोध घेत सांवतोबा संतशिरोमणी झाले. आपले कर्म हेच विठठल आणि विठठल हेच कर्म हा अखंड ध्यास म्हणजे सांवतोबांचा जीवनप्रवास. भक्ती वा अध्यात्म यांचे स्तोम माजवत कर्तव्याकडे पाठ करुन परपोषी जीवन जगणा-या सर्वांसाठीच सांवतोबांचे जीवन म्हणजे झणझणीत अंजनच म्हणावे लागेल. "सांवता सागर ।प्रेमाचा आगर।", असे संत नामदेवांनी सांवतोबांचे अत्यंत समर्पक व नेमके वर्णन केलेले आहे. संत नामदेवांनी भागवत धर्माचे मंदिर उभे करतांना अठरा पगड जातीतील संतांची जी मांदियाळी फुलवली त्यात माळी समाजातील संत सांवता माळी यांचे स्थान निश्चितच सर्वात अनन्य आहे.सोलापुर जिल्हयातील माढा तालुक्यातील 'अरणभेंडी' हे सांवतोबांचे गाव पंढरपुरच्या जवळच वसेलेले आहे. त्यांचे आजोबा 'दैवू माळी' पोट भरण्यासाठी अरण येथे येऊन स्थायिक झाले.या घराण्याचे मुळ गाव मिरज संस्थानातील 'औसे' होय. ते पंढरीचे वारकरी होते. पुरसोबा आणि डोंगरोबा ही त्यांची

भागवत धर्माचे महासमन्वयक : संत नामदेव

Image
जग जिंकणा-या सिंकदराला पंजाबच्या भूमीतून माघार घेत परत फिरावे लागले. त्या ठिकाणी भेट दिल्यावर विनोबा भावे म्हणाले होते,"सिंकदर युद्धाने पंजाब जिंकू शकला नाही,पण नामदेवाने तो प्रेमाने जिंकला." आपल्या नामसंकिर्तनातून प्रेमभक्तीच्या सामर्थ्यावर मध्ययुगीन काळात नामदेवांनी मध्य भारताचे मन जिंकले. नरसी मेहता,मीराबाई आणि कबीर यांना प्रेरणा देणारे नामदेव राष्ट्रीय स्तरावर पोहचणारे पहिले मराठी संत ठरले. पंजाब मधील समाजमनावर नामदेवांच्या व्यक्तिमत्वाचा आणि सहज सुगम भक्तीचा एवढा प्रभाव पडला की शीख धर्माच्या 'गुरुग्रंथ साहेब' मध्ये नामदेवांची ६१ हिंदी पदे समाविष्ट करण्यात आली. पंजाबमध्ये भागवत संप्रदायाचे बीजारोपण नामदेवांनी केले,त्यालाच आज तेथे नामदेव संप्रदाय म्हणतात. भारतातील शीख समाज सर्वप्रथम जगाच्या विविध भागात पोहचल्यामुळे संत नामदेव हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचणारे पहिले मराठी संत ठरतात.वारकरी संप्रदायाची वैचारिक पायाभरणी करणारे मराठीतील आद्य आत्मचरित्रकार,आद्य प्रवासवर्णकार,आद्य कवी कुलगुरु,आद्य किर्तनकार संत नामदेव महाराष्ट्रात कायमच दुर्लक्षित राहिले. १३ व

जेफरसन अजून जीवंत आहे..

Image
" मला शेतीचे संगोपन-संवर्धन किंवा फळबागांची काळजी घेणे यापेक्षा जगातील इतर कोणताही व्यवसाय सुंदर वाटत नाही." अमेरिकेच्या तिस-या राष्ट्राध्यक्षाचे हे विधान आहे.  या व्यक्तीने जीवनात दोनच छंद जोपासले होते.  पहिला म्हणजे राष्ट्रहित आणि दुसरा म्हणजे व्हर्जिनियाच्या डोंगरी भागात असेलेली आपली शेती व घर.  त्याला त्याच्या काळातील एक कुशाग्र राजकीय विचारवंत मानले गेले. असे असले तरी त्याच्या वैयक्तिक राजकीय जीवनात इतर नेत्यांची असफलता ही त्याची सफलता ठरली.  तो स्वतःचे विचार आणि कर्तृत्व यावर कदापि सफल होऊ शकला नाही.  त्याचे व्यक्तिमत्व म्हणजे एक तत्त्वज्ञ आणि शांतीप्रियता यांचा सुंदर मिलाफ होता.  कला,विज्ञान आणि धर्म यांच्यावर चर्चा करतांना मात्र त्याच्या व्यक्तिमत्वातला शांतपणा गळून पडत असे.  त्यावेळी त्याच्या इतका उत्साही आणि आनंदी असणारा व्यक्ती दुसरा कोणी नसेल.  त्याचे जिज्ञासू आणि चंचल मन सदैव आपल्या मातृभूमीला उपयुक्त ठरेल अशा गोष्टींच्या शोधात राहत असे.  तो एक अर्थशास्त्रज्ञ असला तरी त्याच्यातील तत्त्वज्ञाचा प्रभाव त्याच्यातील अर्थशास्त्रज्ञावर कायम होता.  त्यामुळे त