Posts

Showing posts from March, 2021

रंगेल सेनापती आणि विजयपर्वाचा प्रारंभ

Image
नवा कोरा सरसेनापती अमेरिकन क्रांतीसेनेच्या विरोधात लढण्यासाठी  ब्रिटिश सैन्याला मिळाला होता.  तो म्हणजे जॉन  बरगोईन.  त्याच्या आगमनाने ब्रिटिश सैन्यात नवे चैतन्य संचारले होते.  क्रांतीसेनच्या विरोधात अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी नव्हे, तर मौजमस्ती करण्यासाठी हा नवा जोश ब्रिटिश सैन्यात ओसंडून वाहत होता.  सरसेनापतीच रंगेल असेल तर त्याच्या रंगेलपणात सैन्य रंगणे स्वाभाविकच म्हणावे लागेल.  जॉन बरगोईन याने अमेरिकेत ब्रिटिश सैन्याचे सूत्र हाती घेतल्यानंतर पहिले फरमान काढले. त्यानुसार फौजेने कूच करताना अधिका-यांसोबत त्यांच्या कुटुंबियांना नेण्याची मुभा देण्यात आली.  त्यामुळे सेनेच्या आनंदाला पारावार राहिला नाही.  कोणत्याही सैन्याचे लढणे आणि जिंकणे  हे सर्वात महत्वाचे लक्ष असते.  कुटुंबकबिला घेऊन निघालेल्या सैन्याचे पानिपत झाल्याशिवाय राहत नाही.  जगाचा इतिहास याला साक्ष आहे.  बरगोईनच्या आदेशात त्याचा रंगेलपणा दडलेला होता.  यामुळे ब्रिटिश सैन्याचे ध्येय बाजूला पडले आणि सैन्य मौजमजेत रंगून गेले.  नाच,गाणी आणि मेजवान्या सुरू झाल्या.  जनरल होवेच्या काळात ब्रिटिश सैना ही केवळ सेनाच होती.  आ

गुरूमुखी ते गुरूग्रंथ साहेब..

Image
गुरूअंगददेवांनी गुरूगादी भाई अमरदास यांच्याकडे सोपवली,तोपर्यंत त्यांनी एक धर्म म्हणून शीख धर्माची उभारणी अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने प्रारंभ केली होती.  नानकदेवांचा वारसा शीख धर्म म्हणून जेथे आकाराला आला,तो पंजाब आणि सिंध प्रांत होता.  येथे प्रामुख्याने पंजाबी आणि सिंधी भाषा बोलल्या जात होत्या.  नानकदेवांची मातृभाषा पंजाबी होती.  त्यामुळे त्यांच्या गुरूवाणीची भाषा पंजाबी असणे स्वाभाविक होते.  पंजाब लगत असलेल्या सिंध प्रांतात नानकदेवांचा प्रभाव निर्माण झालेला होता,तेथील भाषा सिंधी होती.  पंजाबी व सिंधी या दोन्ही भाषांना प्राचीन परंपरा असली, तरी त्यांना स्वतःची लिपी नव्हती.  सिंधी भाषा फार्सी लिपीत लिहिण्याचा प्रघात पडलेला होता. (काही प्रमाणात संस्कृतच्या देवनागरीचा वापर होत असे.)  सिंधी भाषेचे अनुकरण पंजाबी भाषेत देखील होऊ लागले होते.  नानकपूर्व काळात पंजाब व सिंध प्रांतात 'लेंहदा' बोली प्रचारात होती.  या बोलीची एक स्वतंत्र अशी महाजनी लिपीही व्यापारीजनांत प्रचलित होती.   आणखी काही काळ गेला असता,तर आज पंजाबी भाषा फार्सी लिपीत लिहिली जात असलेली आपल्याला दिसली असती.  जगात

वह सुबह कभी तो आयेगी..

Image
ब्रिटिश सैन्याचा ससेमिरा चूकवत सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन कसाबसा पुढे जात होता.  अखेर  आपल्या तीन हजारी जीर्णर्शीण क्रांतीसेनेला घेऊन न्यू जर्सीच्या बाहेर पडला.  डेलावेअर नदी पार करून तो एका सुरक्षित स्थानी थांबला.  त्याचा पाठलाग करणारी ब्रिटिश सेना न्यू जर्सीत दाखल झाली.  तेथील जनतेने ब्रिटिश सेनेचे स्वागत केले आणि तीला रसद पुरवली.  हिवाळा आता आपले रंग दाखवू लागला होता.  त्यामुळे ब्रिटिश सेना न्यू जर्सीवाल्यांचा पाहुणचार घेत थांबली.  डेलावेअर नदीच्या पलिकडे जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्याची क्रांतीसेना प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत होती.  हिवाळयाच्या थंडगार व अंधा-या लांबलचक रात्रींप्रमाणेचे वॉशिंग्टन ला आपले भविष्य वाटत होते.  'ईस रात की सुबह नही,' अशी भावना कोणत्याही सेनापतीच्या मनात बळावण्याचा काळ तो अनुभवत होता.  वॉशिंग्टन यांनी अशा काळात मोठया साहसाने आणि धैर्याने आपल्या क्रांतीसेनेला तोलून धरले.  कारण ' वह सुबह कभी तो आयेगी,' ही त्यांची भावना त्यांनी प्रबळ केलेली होती.  पराभवाच्या व निराशेच्या काळात वॉशिंग्टन यांनी आपली रणनीती निश्चित केली.  समोरासमोरील युद्

महात्म्याचा खरा वारसदार

Image
अमृतसर जिल्हयातील खेडूर गावातील चौधरी लेहणा,एके दिवशी पहाटे शेजार-याच्या घरातून येणा-या सुमधुर संगीतमय सुरांनी जागे झाले.  त्यांच्या लक्षात आले की त्यांचा शेजारी जोधा कोणते तरी भजन गात आहेत.  त्या स्वरांनी आकर्षित झालेले चौधरी लेहणा जोधाच्या घरात पोहचले.  एवढया पहाटे स्नान करून प्रसन्न चित्ताने भजन करत असलेला जोधा त्यांना दिसला.  तो गात असलेल्या पदांमध्ये चौधरी लेहणांना अलौकिकत्वाचा स्पर्श जाणवला.  पदांमधील शब्दांनी आणि त्यांच्या अर्थानी लेहणांच्या अंतरमनात ते खोलवर उतरत गेले.  त्याचे भजन संपल्यानंतर लेहणांनी जोधाला तो कोणती पदं गात असतो,याविषयी चौकशी केली.  यावर जोधाने सांगितले की तो गुरू नानकदेवांचा शिष्य आहे आणि ही पदे म्हणजे त्यांची गुरूवाणी आहे.  गुरूवाणीने देवीभक्त असलेल्या चौधरी लेहणा यांच्या मनाचा ताबा घेतला होता.  नानकदेवांचे दर्शन घेण्याची आणि त्यांची गुरूवाणी प्रत्यक्षात ऐकण्याची ओढ त्यांचा मनाला लागली.  त्यांचे पिता फेरुमल खत्री यांच्याकडून चिन्तपूर्णी आणि ज्वालादेवी यांची भक्ती त्यांना वारस्यात मिळाली होती.  पंजाबमधील फिरोजपूर जिल्हयातील 'मत्ते की सराय'

पराभव पर्व...

Image
१५ सप्टेंबर १७७६ ला न्यूयॉर्क शहर जागे झाले ते ब्रिटिशांच्या रॉयल नेव्हीच्या धडाडणा-या तोफांनी. हिवाळयाचा प्रारंभ असणा-या सप्टेंबर महिन्यातील या थंड सकाळी न्यूयॉर्क भाजून निघू लागले.  जनरल जॉर्ज वॉशिंग्टनच्या बंकर हिलच्या विजयाने बोस्टन गमावून पळून गेलेला ॲडमिरल होवेला अमेरिकन सैन्याला धडा शिकवणे अपरिहार्य झाले होते.  तसे पाहिले तर जनरल होवे हा माणूस अमेरिकन क्रांतीसैन्य आणि जनता यांच्याविषयी आत्मियता बाळगणारा होता.  आपल्यातील आणि अमेरिकनांमधील समान धाग्याविषयी त्याला जिव्हाळा होता.  अमेरिकन जनतेला केवळ घाबरवणे आणि त्यांना लढण्यापासून परावृत्त करण्याचा त्याचा प्रयत्न होता.  त्याने कायम आपली भूमिका नरमच ठेवली होती.  बंकर हिलचा बदला घेण्यासाठी न्यूयॉर्कला जमिनदोस्त करण्याची त्याची ईच्छा नव्हती;परंतु ब्रिटिश सैन्याचा सरसेनापती म्हणून त्याला त्याच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे अपरिहार्य होते.  न्यूयॉर्क वर आक्रमण करण्यापूर्वी ब्रिटिश सरकारच्या आदेशानुसार जनरल होवे याने क्रांतीसेनेच्या नेत्यांसोबत एक शांतीवार्ता केली होती.  ही शांतीवार्ता जरी ब्रिटिश सरकारच्या आदेशानुसार असली तर

परुष्णी काठी लागली समाधी

Image
ऋग्वेदात राजा सुदास याचे दहा राजांशी युद्ध झाले,असा उल्लेख आढळतो.  यालाच दाशराज्ञ युद्ध असे संबोधले जाते.  या युद्धामुळे संपूर्ण उत्तर भारतावर आर्यांचा हक्क प्रस्थापित झाला.  असे ही सांगितले जाते.  हे युद्ध लढले गेले परुष्णी किंवा इरावती नदीच्या काठावर.  ज्या नदीला आपण आज रावी असे संबोधतो.  दाशराज्ञ युद्धापासून आजवर रावीचा प्रवाह कायमच रक्तात न्हाऊन निघाल्याचा इतिहास सर्वज्ञात आहे.  अशा परुष्णी काठी वसलेल्या देवनगरीत सोळाव्या शतकात म्हणजे २२ सप्टेंबर १५३९ ला एका महात्म्याने देह ठेवला.  शिष्यांचा निरोप घेतांना महात्म्याने आपल्या एका शिष्यावर स्वतः निर्माण केलेल्या प्रकाशमार्गावर इतरांचे सारथ्य करण्याची जबाबदारी सोपवली.  त्याला गुरूगादीवर बसवले.  दुस-या शिष्याच्या हातून नव्या गुरूला तिलक लावून,त्याला सद्गुरू म्हणून अभिषक्त केले.  हा विधी पूर्ण झाल्यावर महात्म्याने स्वतः नव्या गुरुंपुढे पाच पैसे आणि एक नारळ गुरुदक्षिणा म्हणून ठेवले.  मग त्याच्या चरणावर मस्तक ठेवून 'सिक्ख गुरू' म्हणून त्याला प्रणिपात केला.  गुरू असलेल्या महात्म्याने आपल्या शिष्याला गुरूपदी बसवणे आणि त्य

बंकर हिलवरून दिसलेला बोस्टनचा विजय

Image
जनरल म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांनी ३ जुलै १७७५ ला अमेरिकन क्रांतीसेनेचे नेतृत्व स्वीकारले.  जगावर राज्य करणा-या ब्रिटिश साम्राज्याची सेना आणि रॉयल नेव्ही यांच्यासमोर वॉशिंग्टन यांची सेना म्हणजे १६००० शेतक-यांचा जमाव.  कोणतेही सैनिकी प्रशिक्षण नसलेले, हे अमेरिकन शेतकरी म्हणजे स्वांतत्र्याची तीव्र आस मनात घेऊन,''सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिले में है देखना है की जोर कितना बाजू -ए- कातिल में है' अशा आवेशाने शस्त्र घेऊन निघालेली दिवानो की टोली.  त्यांचा सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन म्हणजे सर्वात मोठा दिवाना म्हणावा लागेल.  मॅसेच्युसेटस् प्रांतातील कॅब्रिजमध्ये त्यांनी बोस्टनजवळ जमेलेल्या जमावच्या जनरल पदाचा पदभार स्वीकारला.  त्यानंतर पेनासिल्वेनिया,मेरीलॅड आणि व्हर्जिनिया येथून आणखी ३००० रंगरुट येऊन त्यांच्या क्रांतीसेनेत सामील झाले वॉशिंग्टन यांच्यासमोर अशा अप्रशिक्षित सैन्याचे प्रशिक्षण ही सर्वात मोठी समस्या होती.  अशा सैन्याच्या भरोश्यावर इंग्रजांचा पराभव करण्याची योजना करणे म्हणजे 'दिवा स्वप्न' याची पूर्ण कल्पना वॉशिंग्टन यांना आली होती.  अमेरिकन सैन्य आणि त

रावी काठी देवाची नगरी

Image
'कौम ने पैगाम-ए-गौतम की जरा परवा न की  फिर उठी आखिर सदा तौहीद की पंजाब से,हिन्द को इक मर्द-ए-कामिल ने जगाया ख्वाब से', कवी इक्बाल यांच्या 'नानक' कवितेची पहिली आणि शेवटची ओळीं येथे अधोरखित करावी लागते.  या दोन ओळींच्या दरम्यान असलेल्या ओळींमध्ये अंधारातून प्रकाशाकडे,प्रकाशातून-अंधाराकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे हा भारताचा मोठा इतिहास कथन करण्यात आलेला आहे.  भगवान बुद्ध ते नानकदेव असा हा प्रवास आहे.  भारतीयांना अज्ञानाच्या झोपेतून जागे करणा-या भगवान बुद्धांची काहीही पर्वा न केल्याने त्यांचे भारताला विस्मरण झाले होते.  बुद्धांना विसरून पुन्हा झोपी गेलेल्या भारताला जागे करणारी एकेश्वरवादाची साद पंजाबच्या मातीतून देणारा महापुरूष म्हणजे नानकदेव.  नानकदेवांनी भाई मरदाना यांच्या समवेत अखंड प्रवास करत समाजाला समजून घेतले,तसेच समजाला समजावले.  त्यांच्या प्रवासाबद्दल आणि भेटी दिलेल्या ठिकाणांबद्दल विविध अभ्यासकांनी विविध मते मांडली आहेत.  शीख धर्मपरंपरेत मक्का-मदिना,बगदाद, तिबेट,श्रीलंका इत्यादी ठिकाणी ही गुरू-शिष्याची जोडी भेट देऊन आल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 

भूमापकाने मोजली आकाशाची उंची

Image
काही माणसांचा जीवन प्रवास म्हणजे त्यांनी वाटयाला आलेल्या विसंगतींमध्ये संधी शोधली आणि एक महान व्यक्ती म्हणून जगाने त्यांच्या जीवनातील संगती शोधत त्यांच्या शौर्याची गाथा लिहिली.  ब्रिटिश वसाहत असलेल्या अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये २२ फेब्रुवारी १७३२ ला पेशाने दोघेही शिक्षक असलेल्या दांपत्याच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला.  शिक्षक म्हणजे कुटुंबाची परिस्थिती बेताचीच हे वेगळे सांगणे न लगे.  जगाच्या ईतिहासात विद्यार्थ्याच्या यशातला फार कमी वाटा शिक्षकाला मिळतो मात्र अपयशाची संपूर्ण जबाबदारी त्याच्या माथी मारली जाते.  शिक्षक कायम दरिद्री-लाचार असावा,अशी भारतीयांची अढळ मानसिकता आहे.  पूर्वीचे शिक्षक कसे अत्यंत हालाखीचे जीवन जगत विद्यार्थी घडवत होते,हे घोळून-घोळून ऐकवणा-या चोरांची संख्या आपल्या समाजात कमी नाही.  अशा शिक्षकाच्या हाताखाली हा चोर कसा तयार झाला ? हा प्रश्न मात्र ऐकणाऱ्या कोणाच्याच डोक्यात येत नाही.  कारण तो चोर आज समाजाचा ठेकेदार असतो.  भारतीय माणसाला सुखावणा-या बेताची परिस्थितीत असणा-या शिक्षक जोडप्याच्या घरी जन्माला आलेल्या या मुलाचे जीवन अनेक विसंगतींनी व्यापलेले राहण