Posts

Showing posts from October, 2020

दिगंबर-श्वेतांबर इत्यादी..

Image
भगवान महावीरांच्या निर्वाणानंतर जैन मुनींमध्ये तात्विक मतभेदांना सुरवात झाली. मुनींमधील हे मतभेद वाढत गेले. यामधून जैन धर्म दोन प्रमुख पंथांमध्ये विभाजीत झाला. हे दोन पंथ म्हणजे दिगंबर आणि श्वेतांबर. आजतागायत हे पंथ आपले स्वतंत्र अस्तित्व राखून आहेत. मूलतत्ववाद आणि सुधारणावाद यांच्यातील भेदावर हे पंथ उभे आहेत. ख्रिश्चन धर्मात ज्याप्रमाणे मार्टिन ल्यूथरच्या धर्मकांतीनंतर प्रोटेस्टेंट पंथ निर्माण झाला. त्यानंतर मूलतत्त्ववादी म्हणजे कथोलीक आणि सुधारणावादी म्हणजे प्रोटेस्टेंट असे भेद निश्चित झाले. तसेच जैन धर्मातील दिंगबर हा पंथ जैन तत्त्वज्ञानाच्या मूलतत्त्वांशी निगडीत आहे. दिंगबर आणि श्वेतांबर या दोन पंथात झालेल्या जैन धर्माच्या विभाजनाविषयी वेगवेगळया कथा व कारणं सांगितली जातात. महावीरांच्या पूर्वीपासून स्थविरकल्प व जिनकल्प या नावाचे दोन पंथ अस्तित्वात होते. स्थविरकल्प पंथाचे लोकवस्त्रे वापरीत असत आणि जिनकल्प पंथांतल्या एकाशाखेचे लोकवस्त्र धारण करीत नसत. महावीरांनी हया दोन्ही पंथांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. महावीरांच्या निर्वाणांनंतर चद्रंगुप्त मौर्याच्या कारकीर्दीत

सुखाच्या शोधात नव्या जगाकडे..

Image
युरोपातील लोकांना त्यांच्या साहसी वृत्तीने पृथ्वीवरील एका प्रचंड मोठया खंडाचा शोध लागतो. हया खंडाचे उत्तर व दक्षिण असे विभाजन निसर्गानेच केलेले असते. निसर्गनिर्मित हया दोन्ही भागांना एकत्रितपणे अमेरिका खंड असे संबोधले जाते. यानंतर उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका अशी विभागणी होते. दक्षिण अमेरिकेत अनेक छोटे-छोटे देश जन्माला येतात. उत्तर अमेरिकेत मात्र क्षेत्रफळाने मोठे असे मोजकेच देश निर्माण होतात. उत्तर अमेरिकेतील अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश आज जगात सर्वत्र केवळ अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने या नावाने ओळखला जातो. अमेरिका  या खंडातील इतर देशांनाही व्यापून टाकतो. एक राष्ट्र ते महासत्ता म्हणून अमेरिकेची निर्मिती व विकास यांचा इतिहास अत्यंत सुस्पष्ट आहे. ईनमिन ४५० वर्षांचा इतिहास असणारा हा देश. जगातील एकमेव महासत्ता म्हणून दिमाखाने मिरवतो. हजारो वर्षांचा इतिहास सांगणारे देश त्याच्या खिजगणतीत देखील राहत नाही. रशिया त्याच्याशी टक्कर देण्याचा साम्यवादी प्रयत्न करतो आणि स्वतःची शकलं करून घेतो. जगातील दुसरा साम्यवादी देश चीन आज त्याच्या विश्वव्यापी प्रभूत्वाला आव्हा

निर्माण,नियोजन आणि निर्वाण..

Image
अहिंसा,आत्मजय,व्रत,विनय,शील,मैत्री,समभाव व समाधान अशा अष्ट तत्त्वांचा प्रचार-प्रसार करण्याचा दिशेने भगवान महावीरांनी मार्गक्रमण आरंभले. तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचा काळ महावीरांच्या पूर्वी सुमारे दीडशे वर्षे मानला जातो. काशीचा राजा अश्वसेन यांचे पुत्र असलेले क्षत्रियकुमार पार्श्वनाथ यांनी महावीरांआधी जैन मताच्या पेरणीसाठी आवश्यक मशागत करून ठेवली होती. पार्श्वनाथांनी मांडलेला सिद्धांत 'चातुर्याम मत' म्हणून प्रसिद्ध आहे. 'याम' हा योगशास्त्रातील शब्द आहे. योगशास्त्रात यामलाच महाव्रते असेही संबोधले जाते. यामध्ये अहिंसा,सत्य,अस्तेय,ब्रहमचर्य,अपरिग्रह हे पाच याम किंवा महाव्रते आहेत. पार्श्वनाथांनी ब्रहमचर्याचा समावेश अपरिग्रहामध्ये केला होता. जैन परंपरेत चार यामच मानण्यात आले. यामुळेच पार्श्वनाथांचे मत 'चातुर्याम मत' म्हणून मानण्यात येते. महावीरांपूर्वी स्थविरकल्प व जिनकल्प या नावाचे दोन जैन पंथ अस्तित्वात होते. पार्श्वनाथांच्या सत्तर वर्षाच्या जीवनकार्यात त्यांनी जैन धर्माची पायाभरणी करून ठेवलेली होती. प्राग्वैदिक काळापासून चालत आलेल्या

ते २० काळे लोक...

Image
१६१७ साली इंग्लंडच्या किना-यावर व्हर्जिनियाची तंबाखूने भरलेले जहाज येऊन धडकले. जॉन राल्फच्या अथक प्रयोगशिलता  व परिश्रम यांनी निर्माण झालेली ही तंबाखू. व्हर्जिनिया कंपनीने स्थानिक आदिवासी जमातींनी पिकवलेली तंबाखू याआधी इंग्लंड व युरोपच्या बाजारात विकण्याच्या  केलेल्या असफल प्रयत्नांची किनार या घटनेला होती.यामुळे जॉनच्या तंबाखूचे स्वागत इंग्लंडमध्ये कसे होईल ? याविषयी साशंकता असणे स्वाभाविकच होते. स्पेनचे बियाणं जरी जॉनच्या हाती लागले होते,तरी स्पॅनिश व स्वीडीश तंबाखूसारखी ही तंबाखू ब्रिटिशांना आवडेल याची खात्री जॉनसह कोणालाच नव्हती. यावेळी मात्र व्हर्जिनिया कंपनीचं नशीब फळफळले. जॉन राल्फची  तंबाखू ब्रिटिशांना प्रचंड आवडली. जॉनच्या तंबाखूच्या एका जहाजाने नवजात अमेरिकेच्या निर्यात व्यापाराचा श्रीगणेशा केला. अमेरिकेचा निर्यात व्यापार तंबाखूच्या माध्यमातून आकाराला येऊ लागला. व्हर्जिनियाच्या तंबाखूने ब्रिटनलाच नव्हे तर अखंड युरोपाला वेड लावण्यास सुरवात केली. १६१७ साली जॉनच्या एका जहाजाने सुरवात झालेला हा निर्यात व्यापार १६२० पर्यंत दरवर्षी पन्नास हजार पौंड तंबाखूची इंग्लंडला निर

श्रमण परंपरेचा विस्तार - जैन धर्म..

Image
भगवान महावीर यांचा जीवनप्रवास आणि जैन धर्माची स्थापना यांचा इतिहास पाहत असतांना महावीरपूर्व २३ तीर्थंकरांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचलेल्या श्रमण परंपेरचा इतिहास पाहणे आवश्यक होते. यासाठी मध्यमपावाची धर्मपरिषदेत आपल्या प्रबोधनानं सर्वांची मनं जिंकणा-या महावीरांचा पुढील प्रवास समजण्यासाठी प्राग्वैदिक,अनार्य व अवैदिक श्रमण परंपरेचा इतिहास आपण मधल्या काही लेखांमध्ये जाणून घेतला. कैवल्यज्ञान प्राप्तीनंतर महावीरांनी प्राग्वैदिक श्रमण परंपरेला संस्थागत धर्म म्हणून स्थापन करण्याचे आव्हान स्वीकारले. वैदिक संस्कृती जेंव्हा चरमोत्कर्षावर होती,तेंव्हा मूलनिवासी समाजाची क्षत्रिय प्रणित संस्कृती व तत्त्वज्ञान यांची पिछेहाट झाली होती. एखाद्या अत्यंत विकसित संस्कृतीचा पराभव होतो,तेंव्हा तिचा प्रवाह खंडित होत असतो. अशा संस्कृतीचे तत्त्वज्ञानरूपी संचित देखील विखुरले जाते. अशा प्रवाहाचे पुनरूज्जीवन करणे अति कठिण काम असते. सर्वप्रथम या संस्कृतीच्या वारसदारांना त्यांच्या समृद्ध वारस्याची आठवण करून दयावी लागते. त्यांच्या हरवलेला आत्मविश्वास जागा करावा लागतो. संस्कृतीच्या तत्त्वज्ञानाचे

वाचाल तर वाचाल !

Image
' वाचाल तर वाचाल ' हा महामंत्र पददलितांच्या कल्याणासाठी आयुष्याची आहुती देणा-या महात्मा फु लेंनी समाजाला दिला आहे . भारताचे सर्वात लोकप्रिय माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए . पी . जे . अब्दुल कलाम यांचा जन्मदिन १५ ऑ क्टोबर ' वाचन प्रेरणा दिन ' म्हणून दरवर्षी साजरा केला जा तो . आजच्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शासकिय व सामाजिक स्तरांवर विविध अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . आजच्या पिढिला वाचनसंस्कृतीचे संस्कार देणे हा यासर्व प्रयत्नांचा उद्देश आहे .   डॉ. ए . पी . जे . अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर त्यांची शिल्लक राहिलेली एकमेव लौकिक संपत्ती म्हणजे त्यांची वैयक्तिक वीस हजार ग्रंथांची ग्रंथसंपदा . त्यांच्या या वाचन साधनेतून भारताचा एक महान वैज्ञानिक , आदर्श राष्ट्रपती आणि एवढेच नव्हे तर एक आदर्श व सर्वांग परिपूर्ण व्यक्तिमत्व आकारास आले , हे म्हणणे अयोग्य होणार नाही . भारतात वाचन आणि ग्रंथालय यांना अत्यंत प्राचीन संस्कृती लाभली आहे . अध्यात्म आणि विज्ञान या क्षेत्रांत प्रचंड योगदान देणा-या भारतात ग्रंथांविषयी व वाचनाविषयी प्रेम आणि आदर हा नवा नाही . इ

हिमालय,पेन-पो आणि जैन-बौद्ध परंपरा..

Image
हिमालय पर्वत म्हणजे भारतावरील प्रत्येक आक्रमणाचा आणि भारतातील प्रत्येक परिवर्तनाचा साक्षीदार.अतिप्राचीन काळापासून भारताच्या धार्मिक,राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातील घडामोडींशी हिमालय व त्याच्या भोवतलचा परिसर यांचा संबंध अतिशय महत्वाचा राहिला आहे. प्रत्येक काळात घडणारा व बदलणारा भारत सर्वप्रथम हिमालयाने अनुभवला. द्रविडांची संस्कृती,तिची समृद्धी,आर्यांचे आगमन,द्रविड-आर्य संघर्ष-समन्वय,आर्य-आर्येतर विचारधारांची निर्मिती हा सर्व इतिहास हिमालयाने अनुभवलाच नव्हे तर पचवला आहे. अशा हिमालयाच्या परिसरातील बिहार,नेपाळ व तिबेटची भूमी आणि त्याच्यात उगम पावणा-या सिंधू-गंगा-ब्रम्हपुत्रा आदि नदयांची खोरी यांच्यात आजच्या भारताची मूळं आहेत. प्राग्वैदिक व अनार्य बौद्ध-जैन धर्मपरंपरांचा उगम व विकास यांच्या पहिल्या पाऊलखुणा देखील हिमालयाच्या कुशीतच उमटलेल्या दिसतात. जैन धर्माचा विचार जेंव्हा आपण करतो तेंव्हा हिमालयातील लोकांच्या जुन्या चालीरीतीमध्ये जैन धर्माशी साधर्म्य सांगणा-या अनेक गोष्टी आढळतात. हिमालयातील पश्चिम नेपाळमध्ये ठाकूर जमातीचे लोक राहतात. त्यांच्या उपासना पंथाचे नाव