Posts

Showing posts from February, 2021

तीर्थी धोंडा पाणी

Image
भगवान श्रीकृष्णाने ज्या भूमीवर अर्जुनाला गीतामृत दिले.  अधर्मावर धर्माचा विजय निश्चित करण्यासाठी जी भूमी  असंख्य योद्धांच्या रक्ताने न्हाऊन निघाली.  हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या सर्व पूर्वजांचे पिंडदान जेथे केले जाते,ती कुरूक्षेत्राची भूमी.  त्यामुळे कुरूक्षेत्र हे एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते.  कुरूक्षेत्रामध्ये एक गुरू-शिष्याची जोडी धर्मशाळेऐवजी एका सरोवराच्या काठी असलेल्या वृक्षाच्या छायेत मुक्कामाला होती.  तीर्थक्षेत्री असलेले हे सरोवर आणि त्याचे घाट देखील पवित्र.  त्यामुळे पवित्र स्नान आणि कर्मकांड करण्यासाठी जमलेली भाविकांची मांदियाळी आणि दानधर्माची चाललेली दिवाळी. असा प्राचीन काळापासून आजवर तीर्थस्थानी असलेला चिरपरिचित नजारा.  त्यात तो दिवस ग्रहणाचा म्हणजे भाविकांसाठी स्नान करुन राहूपासून मुक्तीचा आणि ब्राहमणपुरोहितांना दक्षिणेच्या प्राप्तीचा.  हा सगळा खेळ सरोवराच्या काठावर बसलेल्या गुरू-शिष्यांचे मनोरंजन करत होता.  गुरूने आपल्या शिष्याला रबाबाचे सुर छेडण्यास सांगितले आणि स्वतःच्या अलौकिक-अपार्थिव स्वरांनी गुरूवाणी प्रकट करण्यास सुरवात केली.  गुरूवाणीत

जाहीरनाम्यातील मेघगर्जना

Image
'आमचा दृढ विश्वास आहे की,ईश्वराने प्रत्येक मानव समान बनवला आहे आणि प्रत्येक माणसाला त्याचे जीवन जगण्याचा आणि जीवनात सुखाचा व समृद्धीचा शोध घेण्याचा स्वयंसिद्ध अधिकार आहे.' या  थॉमस जेफरसनच्या  आवेशपूर्ण उद्गारांनी न्यूयॉर्कच्या सिटी हॉलसमोरील  प्रांगणात जमलेला प्रचंड जनसमुदाय भारवून गेला होता.  ९ जुलै १७७६ चा हा दिवस अमेरिकेच्या इतिहासात कायमचा कोरला गेला आहे.  ब्रिटनच्या रॉयल नेव्हीच्या जहाजांचा प्रचंड मोठा बेडा न्यूयॉर्कला कोणत्याही क्षणी जमीनदोस्त करण्याचा तयारीत असतांना,  अमेरिकन क्रांतीचा बौद्धिक सेनापती थॉमस जेफरसन न्यूयॉर्कवासीयांच्या माध्यमातून अखिल अमेरिकेच्या मनात विद्रोहाची बारूद भरत होता.  ऐव्हाना स्वातंत्र्याची भावना आता अमेरिकेच्या धमण्यांमधून रक्त म्हणून वाहू लागली होती.  'अभी नही तो कभी नही' याची जाणीव अमेरिकन समाजाला झाली होती.  जेफरसनच्या शब्दांनी पेटलेला न्यूयॉर्कवासीयांचा जनसमुदाय 'बोलिंग ग्रीन' या सिटी हॉलजवळील ठिकाणी पोहचला.  तेथे दिमाखात उभा असलेला ब्रिटश साम्राज्याचा सम्राट किंग जॉर्ज तिसरा याचा पुतळा जनसमुदायाने जमिनदोस्त केल

नव्या आक्रमकाला बदलवला

Image
इ. स. १५१९ पासून भारतीय प्रदेशांवर एका नव्या आकमणाच्या लाटा धडकू लागल्या.  तैमूनलंगचा पाचवा वारस आणि आईकडून चंगीझखानाचा नातलग असलेला जहीरुद्दीन मुहंमद बाबर याने इ स १५०४ ला काबूल जिंकले. अफगाणिस्तानावर विजय मिळवल्यानंतर इतर आक्रमकांप्रमाणे त्याची नजर भारताकडे वळली.  दिल्लीच्या तख्तावर इब्राहीमखान लोदी होता.  इ. स. १५२४ पर्यंत बाबराने एकूण चार स्वा-या भारतावर केल्या.  अखेर १५२६ ला पानिपतच्या युद्धात बाबराने सुलतान इब्राहीमखान लोदीचा पराभव करून,त्याला ठार मारले.  बाबराचा संघर्ष प्रामुख्याने त्याच्या आधी भारतात आलेल्या मुसलमानांशी झाला.  आपल्या सामर्थ्यशाली तोफखान्याच्या जोरावर भारतातील मुसलमानांवर बाबराने तसा अत्यंत सहज विजय प्राप्त केला होता.  यासाठीच इतिहासाचा अन्वयार्थ हा राजकिय महत्वाकांक्षांच्या दृष्टिकोनातून लावणे अत्यंत आवश्यक असते.  राज्यकर्त्यांकडून जेंव्हा एखादे आक्रमण किंवा युद्ध घडवले जाते,तेंव्हा त्याच्यामागे स्वतःची कधीही पूर्ण न होणारी सत्तालालसा,हे खरे कारण असते. हा राज्यकर्ता त्याला त्यावेळी जनता व सैन्य यांच्यात उन्माद निर्माण करण्यासाठी आवश्यक गोष्टीचा अत्य

स्वातंत्र्ययुद्धाचे बौद्धिक पोषण करणारा बळीराजा

Image
कोणतेही सार्वजनिक आंदोलन अथवा राज्य व्यवस्था यांच्यात कालौघात दोन पक्ष निर्माण होणे,अत्यंत स्वाभाविक आहे.  जहाल-मवाळ,कर्मठ-उदार,राजभक्त-देशभक्त इत्यादी नावांनी हे पक्ष ओळखले जातात.  आंदोलन किंवा राज्यव्यवस्था यांच्या स्वरूपानुसार हे नामकरण होत असते.  अमेरिकन कांतीत देखील देशभक्त (Patriots) आणि राजभक्त (Loyalists) असे दोन पक्ष निर्माण झाले.  उदारवादी किंवा देशभक्त जहाल होते.  त्यांचा ब्रिटिश सरकारच्या धोरणांना तीव्र विरोध होता.  एका अर्थाने हा पक्ष संपूर्ण स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता होता.  राजभक्त किंवा रूढीवादी मध्यममार्गाचा अवलंब करण्याचे पक्षधर होते.  नेमस्तपणे आपल्या मागण्या ब्रिटिश सरकारसमोर ठेवाव्यात आणि मान्य करून घ्याव्यात असा त्यांचा आग्रह होता.  भारतीय स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसमध्ये देखील जहाल-मवाळ असे दोन पक्ष असल्याचा इतिहास सर्वज्ञात आहे.  अमेरिकन स्वातंत्र्य लढयात प्रारंभी दोन्ही पक्षांचा वाद हा दृष्टीकोनात्मक अंतर ईथपर्यंत मर्यादित होता.  एका ऐतिहासिक घटनेने दोन पक्षातील दरी रुंदावत गेली.  ही घटना म्हणजे स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याची घोषणा  अमेरिकन स्वातंत्र

लोकशिक्षक महात्मा

Image
नानकदेव व भाई मर्दाना प्रवास करत-करत मक्केला पोहचले.  मक्केत मुक्काम असताना एके रात्री नानकदेव झोपले होते.  अचानक कुणी तरी आपल्याला मारत आहे,याची जाणीव झाल्याने त्यांना जाग आली.  एक संतापलेला मौलवी त्यांना मारत होता.  त्यांनी मौलवीला मारण्याचे कारण विचारले असता,संतापलेला मौलवी म्हणाला," कोण हा मूर्ख ! पवित्र काबाकडे पाय करून झोपतो म्हणजे काय ?" झोपलेल्या नानकदेवांनी मक्केतील पवित्र काबाकडे पाय केले आहे,असे मौलवीचे मत होते.  त्यामुळे तो संतापला होता.  संतापलेल्या आणि मारहाण करत असलेल्या मौलवीची नानकदेवांना गंमत वाटली.  पवित्र काबाच्या दिशेने पाय करून झोपलो म्हणून हा मौलवी संतापतो आणि आपल्याला मारहाण करतो.  'अखंड जयाला देवाचा शेजार' असा हा मौलवी संतापू शकतो आणि मारहाण करू शकतो,खरोखर याला खरा धर्म आणि ईश्वर यांची जाणीव झाले आहे का? असा प्रश्न नानकदेवांना पडला.  त्यांनी दाभिंक मौलवीची अक्कल ठिकाण्यावर आणण्यासाठी त्याला प्रश्न केला की,"मियाजी आपण मला का मारत आहात?"त्यावर मौलवी म्हणाला,"काबाकडे पाय करून झोपतोस ?" यावर नानकदेव त्याला शांतपणे म

रॉयल नेव्हीच्या वेढयातील न्यूयॉर्क

Image
२९ जून १७७६ ची पहाट न्यूयॉर्कच्या इतिहासात अजरामर झाली आहे.  या दिवशी पहाटे न्यूयॉर्कवासीयांनी जे दृश्य पाहिले,त्याने त्यांच्या जीवाचा थरकाप उडाला.  ग्रेट ब्रिटनच्या रॉयल नेव्हीच्या महाकाय युद्धनौकांनी न्यूयॉर्कचा समुद्र व्यापला होता.  'चॅथम','ग्रेहाउंड','फोनिक्स' आणि 'अशिया' सारख्या इंग्लंडच्या सागरी शक्तीचा प्रत्यय देणा-या प्रख्यात युद्धनौका उगवत्या सूर्यासोबत न्यूयॉर्कच्या किना-यावर झळकल्या.  ब्रिटन ही त्यावेळी जगातील महासत्ता आणि त्यांचे आरमार म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ आरमार असे समीकरण होते.  समुद्रावर सत्ता असणारे देश याकाळात बलाढय मानले जात. व्यापार,युद्ध आणि प्रवास यासाठी जहाज हे तेंव्हा सर्वात वेगवान साधन होते.  भारतात याचे महत्व केवळ छत्रपती शिवरायांना सर्वप्रथम कळाले होते. त्यामुळेच त्यांनी भारतातील पहिल्या आरमाराची स्थापना केली.  बाकी भारताला मात्र समुद्र पर्यटन देखील वर्ज्य होते.  ग्रेट ब्रिटनचे सर्वात बलाढय आरमार पाहून न्यूयॉर्क शहराची गाळण उडाली.  स्वतःच्या अस्तित्वाची खात्रीच त्यांना उरली नाही.  रॉयल नेव्हीचे शंभर जहाज रात्रीच्

गुरू नानक शाह फकीर...

Image
'नाह कोई हिंदू नाह मुसलमान' हा नानकदेवांनी सच्चखंडाच्या प्रसंगानंतरचा पहिला संदेश. त्यांच्या पहिल्या संदेशात शिख धर्माचा पाया रचला गेला. नानकदेवांचा पहिला संदेश शिख धर्माची भविष्यकालिन वाटचाल निश्चत करणार होता. त्यांच्या संदेशाचा अन्वयार्थ शोधण्यासाठी आपल्या पुन्हा एकदा तळवंडीला जावे लागते. तळवंडीच्या  मातीने नानकदेवांच्या बालमनाला आणि व्यक्तिमत्वाला दिलेला आकार वैशिष्टपूर्ण होता. रायबुलार यांच्यासारख्या उदार मुसलमान जमिनदाराचे गाव तळवंडी. त्यांचे कारभारी असणारे नानकदेवांचे पिता काळूराम मेहता. हया दोन व्यक्तिमत्वांच्या संबंधात व सौहादर्यात नानकदेवांना दोन एकदम विरुद्ध धर्मपरंपरांचा परिचय एकाच वेळी होत गेला. परिचयासोबतच या धर्मपरंपरांचा समन्वय देखील होऊ शकतो,याची कल्पना येत गेली. मुसलमान जमिनदारीचे गाव असल्याने तळवंडीत हिंदूबरोबरच मुसलमान समाजही मोठया प्रमाणात होता. त्यामुळे तळवंडीत हिंदू पंडितांसोबतच मुसलमान काजी-मुल्ला-फकीर देखील होते. सुफी संप्रदायाचा परिचय तळवंडीला झालेला होता. सम्मद हुसेन नावाचा एक असाच सुफी फकीराचे तळवंडीत वास्तव्य होते. नानकदेवांची सम्मद हुसेन