Posts

Showing posts from December, 2020

दमनकारी कायदे आणि स्वातंत्र्ययुद्ध...

Image
स्वातंत्र्य मानवच नव्हे ,तर प्रत्येक सजिवाचा श्वास असतो. भौतिक परिस्थिती आणि स्वातंत्र्य भावना यांच्यात दुरान्वयाने संबंध प्रस्थापित होऊ शकत नाही. साखळदंड सोन्याचे आहेत किंवा खाण्यासाठी मोत्याचे दाणे आहेत. हे स्वातंत्र्यापुढे कवडीमोल असते. लोकशाही राज्यपद्धती मानवी स्वातंत्र्याची आदर्श अवस्था समजली जाते. लोकशाहीच्या मुखवटयाखाली हुकूमशाही वावरत असते. हे देखील नाकारता येत नाही. असे असले तरी लोकशाहीच्या मुखवटयापायी हुकूमशाहीला आवर घालणे शक्य असते. भारतीय राज्यघटनेने एका अत्यंत आदर्श व प्रगल्भ लोकशाहीच्या पायावर स्वतंत्र भारताला उभे केले आहे. संविधानाला अपेक्षित लोकशाही शंभर टक्के अवतरली नाही. हे विदारक वास्तव आहे. एक मात्र तेवढेच खरे आहे की त्यामुळे स्वतंत्र भारतातील हुकूमशाहीच्या अनेक लाटा आजवर भारतीय जनतेने परतवलेल्या आहेत. संसदीय लोकशाहीचा पहिला प्रयोग करणा-या इंग्लंडला इतरांच्या बाबतीत प्रत्येक सजिवाचा मूलभूत अधिकार असणा-या स्वातंत्र्याचा सोयीस्कर विसर पडला. भारताप्रमाणेच जगाने ते अनुभवले. इंग्लंडचा इतिहास पाहता आपत्ती आणि महानता अशा दोन्ही स्थितींचा अनुभव या देशाने घेतला.

जानवे नव्हे जाणावे...

Image
तलवंडी रायन्नोयी गावात एक मुंज विधी आयोजित करण्यात आला होता. नऊ वर्षाचा एका मुलाचा हा उपनयन संस्कार होता. यजमान कुंटुंबाचे सर्व नातलग,गावकरी आणि प्रतिष्ठित नागरिक मुंजीसाठी उपस्थित होते. कारण तलवंडीमधील प्रतिष्ठित काळूराम मेहता यांच्या घरचा कार्यक्रम असल्याने कार्यक्रमाचा दिमाखच और होता. तलवंडी परिसरातील प्रसिद्ध पंडित हरदयाल नावाचा ब्राहमण मुंज विधीचे पौरोहित्य करत होता. मुंजेचे सर्व विधी यथासांग पार पडले. शेवटचा विधी होता,मुलाच्या गळयात यज्ञोपवित म्हणजे जानव घालण्याचा. पंडित हरदयाल मुलाच्या गळयात जानव घालू लागला,तसे एक अघटित घडले. ज्याची मुंज होत होती,त्या नऊ वर्षाच्या मुलाने जानव घालण्यास नकार दिला. त्याचबरोबर त्याने हरदयालच्या हातातून जानव हिसाकावून घेतले आणि त्याला प्रश्न केला,"पंडितजी,जानवे कशासाठी घालायचे? याचा उपयोग काय?" लहानग्याच्या प्रश्नाने हरदयाल अवाक झाला. आजवर त्याने असंख्य उपनयन संस्कार म्हणजेच मुंज विधी केले होते. परंतु असा प्रश्न आजवर कोणी विचारला नव्हता किंवा कोणाला पडला ही नव्हता. गडबडलेला हरदयाल म्हणाला," या जानव्याच्या सूत्रात सर्व हिंदु

'मिनिटमन' मावळे

Image
बोस्टन शहराची कोंडीकरून त्याला वठणीवर आणण्यासाठी ब्रिटिश सत्तेने सर्वोतोपरी प्रयत्न केले. त्याचा उलटा परिणाम असा झाला की अमेरिकन स्वातंत्र्यलढयाला प्रारंभ झाला. बोस्टनजवळील लेक्झिंगटन आणि कॉंकार्ड या दोन शहरातून स्वातंत्र्य लढयाचा बिगुल वाजला. लेक्झिंगटन आणि कॉंकार्ड ही शहरे बोस्टन व सध्याच्या आर्लिंगटन शहराजवळ आहेत. या दोन शहरात ब्रिटिश फौजांविरूद्ध सशस्त्र उठाव झाला आणि अमेरिकन स्वातंत्र्यलढयाला आरंभ झाला. अमेरिकन स्वातंत्र्यढयात एक अभिनव कल्पना समोर आली. ती म्हणजे मिनिटमन. स्वातंत्र्यलढयातील क्रांतीकारकांनी मिनिटमन ही संकल्पना निर्माण केली. स्वातंत्र्ययोद्धांनी एक गट स्थापन केला ज्याला मिनिटमन असे नाव देण्यात आले. स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणा-या क्रांतीकारकांपैकी २५% लोक मिनिटमन झाले होते. संदेशवहनाचे एक अत्यंत प्रभावी व जलद जाळे मिनिटमनांनी निर्माण केले. ब्रिटिश फौजांच्या प्रत्येक हालचालीची आणि योजनांची माहिती अत्यंत वेगाने क्रांतीकारकांपर्यंत पोहचविण्याचे काम मिनिटमन करत होते. शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जगाने दखल घेतलेल्या आणि विविध देशांमधील क्रांतीमध्ये वापरण्यात आल

रावीच्या काठावर...

Image
लाहोरपासून तीस मैल अंतरावर वसलेले एक छोटे गाव तलवंडी रायन्नोयी. गावाच्या जवळून वाहणा-या विस्तीर्ण रावी नदीचे हिरवे काठ तलवंडीच्या सौंदर्याची कल्पना करण्यास पुरसे. तसे हे जमिनदाराचे गाव होते. बारा गावाची जमिनदारी असणारे रायबुलार धर्मांतरीत मुसलमान,असले तरी अत्यंत सहिष्णू. त्यामुळे त्याच्या जमिनदारीत प्रजा त्याकाळाच्या तुलनेत सुखात होती. १५ एप्रिल १४६९ ला तलवंडीवासी आपल्या दैनंदिन व्यवहारात व्यस्त होते. जमिनदार रायबुलार यांचे कुळकर्णी होते,मेहता कल्याणदास. ते काळूराम नावाने तलवंडी परिसरात प्रसिद्ध होते. काळूराम रायबुलारांकडे कुळकर्णी असले,तरी एक सधन शेतकरी म्हणूनही त्यांचा लौकिक होता. त्यांची पत्नी त्रिपताका उर्फ तृत्पादेवी. आपल्या नावाप्रमाणेच एक प्रसन्न व गृहकर्तव्यदक्ष गृहिणी. त्यांना नानकी नावाची मुलगी. तिचा जन्म आपल्या आजोळी म्हणजे नानांच्या घरी झाला. आजोबांची म्हणजे नानांची लाडकी म्हणून तिचे नाव नानकी ठेवण्यात आले. काळूराम व तृप्तादेवी हे अत्यंत धर्मपरायण दांपत्य होते. त्यांच्या जीवनातील व तलवंडी गावातील वैशाख शु.३ विक्रम संवत् १५२६ अर्थात १५ एप्रिल १४६९ हा  एक सामान्य

जब नाश मनुज पर छाता है...

Image
मॅसेच्युसेटस्  प्रांतातील परिस्थिती गंभीर बनत गेली. बोस्टनची कोंडी विद्रोहाला कारण ठरणार होती. ब्रिटिश सत्तेच्या विरोधात अंसतोष शिगेला पोहचला होता. या दरम्यान अमेरिकेतील सर्व १३वसाहतींचे पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आले. जॉर्जिया प्रांत वगळता उर्वरित १२ प्रांतातील वसाहत प्रतिनिधी पहिल्या महाद्विपीय कॉग्रेसमध्ये सहभागी झाले. १७७४ च्या सप्टेंबर महिन्यात मॅसेच्युसेटस् प्रांतातील फिलोडेलफिया शहरात First Continental Congress चे आयोजन करण्यात आले होते.  सत्ताधं ब्रिटिश सरकार आपल्या लाभाची धोरणे व कायदे अमेरिकन जनतेवर लादत होते. ब्रिटिशांच्या शोषणाला व दमनाला सडेतोड उत्तर देण्यासाठी अमेरिकन समाजाने आता कंबर कसली होती. अमेरिकन जनतेला वठणीवर आणण्यासाठी बेदरकार ब्रिटिश राजसत्तेने ५ नवीन कायदे संमत केले होते. ज्यांना एकत्रितपणे 'असहनीय अधिनियम' असे संबोधले जाते. 'बोस्टन पोर्टल बील' या त्यातील पहिल्या कायदयानुसार बोस्टन बंदरातील बाहय व्यापारावर बंदी घालण्यात आली. मॅसेच्युसेटस् गर्व्हमेंट अùक्ट नावाच्या दुस-या कायदयाने प्रत्येक वसाहतीतील कांउसिलर्स म्हणजे सल्लागारांची नि

आक्रमकांसोबत आलेले सुफी...

Image
३५० वर्षे सिंध प्रांतात म्हणजेच पंजाबजवळ अरब लोक राहिले. अखेर ते अरबस्थानाकडे परतले. इसवीसनाच्या दहाव्या शतकात अरबांपेक्षा वेगळया स्वरूपाच्या इस्लामी आक्रमणांचे पर्व प्रारंभ झाले. इस्लामवरील बगदादच्या खलिफांची पकड सैल झाली. त्यामुळे इस्लामच्या प्रचार-प्रसारातील त्यांचा उत्साह मावळला. अरबस्थानातील अरबांच्या विविध टोळया इस्लामच्या नावाने एका छत्राखाली आल्या होत्या. त्यांच्यात परत फुट पडली. अरबस्थानाच्या बाहेर अरबांनी ज्या प्रदेशात इस्लाम पोहचवला होता,त्या भागातील मुसलमान मात्र अधिक कडवे होत गेले. अरब पुन्हा अरबस्थानाच्या सीमांमध्ये आक्रसले गेले. नव्याने मुसलमान झालेल्या अफगाण तुर्कांनी इस्लामचा उपयोग करून आपला समाज संघटीत केला. इस्लामबद्दल कडवेपण आणि अभिमान याचा वापर करून अफगाणी तुर्कांनी गजनी येथे एक बळकट इस्लामी राज्याची स्थापना केली. अफगाण तुर्कांच्या गजनी राजसत्तेचा संस्थापक पहिला महमूद सुलतान होता. आज ज्याला अफगाणिस्थान संबोधले जाते,त्याचा उल्लेख महाभारतात गांधार म्हणून आलेला आहे. शकुनी मामा हा गांधार नरेश होता. पहिला महमूद सुलतानच्या काळात गांधारवर ब्राह्मण राजसत्ता होत

बोस्टन पेटले आणि अमेरिका एकवटला..

Image
  रिव्हेर कॉ पर आणि ब्रास ही आज अमेरिकेतील एक विशालकाय कंपनी म्हणून ओळखली जाते . पॉ ल रिव्हेरे नावाचा क्रां तीकारक उद्योजक हा या कंपनीचा संस्थापक . डर्डमाऊथ जहाजावरील १७ लाख पौंड निकृष्ट चहाला  बोस्टनवासीयांनी जलसमाधी दिल्यानंतर ब्रिटिश राजसत्तेविरोधात अमेरिकन असंतोषाला एका अर्थान निर्णायक तोंड फु टले . अशा वेळी सरा फी चा व्यवसाय करणारा उदयोन्मुख उद्योजक पॉ ल रिव्हेरे याने क्रां तीला बाळसे धरण्यासाठी अत्यंत महत्वाचे योगदान दिले . चांदीच्या वस्तू-दागिने विकण्याचा प ॉ लचा व्यवसाय अत्यंत तेजीत होता . क्रां तीच्या जन्मकाळात पॉ लने ' गन पावडर ' बनविण्याची प्र क्रि या स्वतः शिकून घेतली . त्याने बनवलेल्या अनेक टन गन पावडरने ब्रिटिश फौ जांची वाताहत करण्यात क्रां तीकारकांना सहकार्य केले . पॉ लने गन पावडरचे उत्पादन व पुरवठा ऐवढेच काम केले नाही . त्याने इंग्रज फौ जांच्या योजना व हालचाली यांची माहिती क्रां तीसेनेला पुरविण्याचे अत्यंत महत्वाचे काम देखील केले . अमेरिकेतील असंतोष आपण सहजपणे चिरडून टाकू असा फा जिल आत्मविश्वास ब्रिटिश सत्तेला होता . सत्तेच्या जोरावर निर्माण झालेला आत