Posts

Showing posts from September, 2021

माणसाच्या पूर्णत्वाचे निरव संगीत...

Image
चीनच्या सीमवरील नाक्यावर वयोवृद्ध लाओत्से पोहचला होता.  आपली काठी टेकवत प्रवासाने श्रमलेल्या त्याच्या जर्जर शरीराला काही काळ विसाव्याची गरज होती.  घशाला कोरड पडली होती आणि पोट दोन घासांची मागणी करत होते.  नाक्यावरील पहारेक-यांनी वृद्ध लाओत्सेकडे पाहिले.  नावाने आणि तत्त्वज्ञानाने अवघ्या चीनला माहीत असलेला लाओत्से सीमेवरील पहारेक-यांना त्याकाळाचा विचार करता चेह-याने माहीत असणं शक्यच नव्हते.  हा म्हातारा येथे कशाला आला असेल? याचा विचार करत असातांनाच लाओत्सेने त्यांच्याकडे पाणी मागीतले.  म्हाता-याची वय आणि अवस्था पाहून पहारेक-यांनी तात्काळ पाणी, तर दिलेच त्यासोबत त्याला भोजन देखील दिले.  अन्न-पाणी पोटात जाताच लाओत्सेच्या सुरकुत्यांनी भरलेला चेह-यावर तकवा जाणवू लागला.  पहारेक-यांनी त्याला तेथे येण्याचे कारण विचारले तेंव्हा तो म्हणाला ,"मला चीन देशाच्या बाहेर जायचे आहे,म्हणून मी येथे आलो," असे सांगितले.  पहारेकरी म्हणाले,"बाबा ! तुमच्यासोबत कोणी नाही ? तुम्हाला चीनमधून बाहेर पडून कोठे आणि कशासाठी जायचे आहे? एकटयाने प्रवास करण्यासारखी तुमची अवस्था देखील नाही."

वेडया म्हाता-याचा अखेरचा मुक्काम...

Image
इसवी सनाच्या पूर्व सहाव्या शतकातील कोणत्या तरी दिवसाची सांयकाळ.  एक वृद्ध आपली काठी टेकवत चीनच्या सीमेजवळ पोहचला.  चीनची ही कोणती सीमा होती,हे देखील आज ज्ञात नाही.  लांबचा प्रवास आणि वयाने थकलेला हा जराजर वृद्ध सीमेवरील नाक्याजवळ येऊन विश्रांतीसाठी विसावला.  त्याला आपला चीन देश सोडून कायमचे बाहेर जायचे होते.  चीनमधील तत्कालिन परिस्थितीमुळे ही वयोवृद्ध व्यक्ती व्यथीत झालेली होती.  चीनच्या राजसिंहासनावर दावा सांगण्यासाठी सुरु असलेल्या गलिच्छ घडामोडी आणि रक्तरंजीत संघर्ष या वृद्धाला नकोसा झाला होता.  कोणे एके काळी हा वृद्ध देखील चीन मधील चीनमधील 'चाऊ' अथवा 'झौऊ' राज्याच्या दरबारात 'राजदफ्तरदार' अथवा 'ग्रंथपाल' होता.  वयाच्या साठीपर्यंत त्याने आपली नोकरी अत्यंत नेकीने केली.  चीनच्या तत्कालिन घाणेरडया राजकारणाने अखेर त्याचा ही बळी घेतला.  त्याला राजदरबारातून पदच्युत केले गेले/  हा वृद्ध केवळ कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी मनमारून जगणारा चाकरमान्या नव्हता.  तो संसारात असून त्यात न रमलेला गुप्त ऋषी होता.  त्याने आपली सारी हयात एका महान आणि कालजयी तत्

लाओत्सेला शिष्य मिळाला नाही !

Image
कन्प‹युशियस एकदा 'झौओ' किंवा 'चाऊ' प्रांतात भ्रमंती करत होता.  त्यावेळी लाओत्सेला भेटण्याची ईच्छा त्याच्या मनात उत्पन्न झाली.  कायम राजकीय आश्रय आणि सुविधायुक्त जीवनाचा उपभोक्ता असलेला कन्प‹युसियस लाओत्सेला भेटीला गेला.  लाओत्से एका झोपडीवजा घरात राहत होता.  कन्प‹युशियसने लाओत्सेचे निवासस्थान पाहिले तेंव्हा त्याचा भ्रमनिरास झाला.  त्यावेळी कन्प‹युशियसचे वय चौतिस वर्षे आणि लाओत्से चौ-यांशी वर्षाचा होता.  अगदी तरुण वयात कन्प‹युशियसची ख्याती चीनमध्ये सर्वदूर झाली होती.  लाओत्सेच्या एकदम विरुद्ध त्याचे तत्त्वज्ञान होते.  सामाजिक आचरणाच्या सामर्थ्यावर चीनचे गतवैभव परत मिळवण्याची त्याची महत्वकांक्षा होती.  चीनच्या इतिहासाचे संकलन,संशोधन आणि सांगोपांग अभ्यास यांच्या माध्यमातून चीनी समाजाला त्याच्या उज्ज्वल गतकाळातून स्फूर्ती निर्माण देण्यासाठी कन्प‹युशियसची धडपड सुरु होती.  इतिहासाकडून प्रेरणा घेऊन त्याला नवा चीन घडवायचा होता.  आपले हे विचार त्याने लाओत्सेला ऐकवले.  लाओत्सेला मात्र स्वतःचा शोध घेऊन खरा माणूस शोधायचा होता.   कन्प‹युशियसचे विचार ऐकून लाओत्सेला हसू आल

आणि अमेरिका पाण्यावर धावू लागला..

Image
युरोपातील वसाहतवादी उत्तर अमेरिका खंडात अवतरल्यामुळे मिसिसिपी नदीच्या काठा-काठाने वस्ती करुन राहणारे रेडइंडियन्संच्या जीवनात प्रचंड परिवर्तन झाले.  शिकार आणि काही प्रमाणात शेती यांच्या आधारे जीवन जगणारे हे लोक हया खंडात कधी आणि कसे आले होते? याविषयी अनेक अभ्यासकांनी विविध सिद्धांत मांडलेले आहेत.  काही अभ्यासकांच्या मते हे लोक ५००० वर्षे आधीपासून हया भूमीवर वास्तव्य करुन होते.  जागतिकिकरणामुळे भारताने गेल्या २० वर्षात जसा वेगवान व अकल्पनीय बदल अनुभवला तसेच काही हया रेडइंडियन्सचे झाले होते.  ज्या मिसिसिपी नदीच्या आधाराने रेडइंडियन्सच्या अगणित पिढया जगल्या,फुलल्या आणि बहरल्या. तीच मिसिसिपी प्रारंभी वसाहतवादयांसाठी सर्वात मोठा अडसर होती.  अमेरिकेच्या भूमीवर सर्वप्रथम आलेल्या स्पॅनिश व फ्रेंच लोकांनी मिसिसिपीच्या काठावर आपल्या वसाहती वसवल्या.  तिच्या एका काठावर न्यू स्पेन आणि दुस-या काठावर न्यू फ्रांस निर्माण झाले.  हया दोन्हींना विभागणारी होती मिसिसिपी.  वसाहतवादी अमेरिकेच्या भूमीवर पोहचले आणि वसाहती स्थापन करुन राहू लागले,तेंव्हा पासूनच त्यांनी रस्ते निर्माण करण्यास सुरवात केल

'मिसि-जिइबी' च्या तीरावर..

Image
जगातील सर्व मानवी संस्कृतींना जन्म देणारी, घडवणारी,फुलवणारी आणि संपवणारी ही कोणत्याही नदीची मानवी ओळख.  नदी मानवी संस्कृतीची जन्मदात्री असली तरी तिच्या स्वतःच्या जन्माचे रहस्य निसर्गात आणि भूगोलात दडलेले आहे. मानवाने तिच्या काठावर वस्ती करून स्वतःची संस्कृती घडवली.  अनेक मानवी संस्कृत्या नदयांच्या पाण्यावर उभ्या राहून गगनाला भिडल्या आणि जमिनदोस्त ही झाल्या.  ही प्रक्रिया निरंतर सुरूच आहे.  असे असले तरी कोणत्याही नदीचे नैसर्गिक व भौगोलिक स्थान मात्र चिरंतन आहे.  नदीचा उगम,तिचा प्रवास,प्रवासातील वाटां-वळणं आणि अखेर सागराला मिळणं. हे मानवाने संस्कृती निर्माण करण्याच्या आधीही असेच होते आणि जगातील सर्व मानवी संस्कृत्या नष्ट झाल्या तरी असेच राहणार आहे.  मानवाने भाषेची निर्मिती केल्यानंतर त्याची संस्कृती निर्माण होत गेली.  मात्र मानवाची भाषा आणि तिच्या आधारे निर्माण झालेली संस्कृती मानवाच्या विविध टोळया नदीच्या काठावर स्थिरावल्यानंतरच अस्तित्वात येऊ शकल्या.  निसर्गाच्या व्याख्येत 'पशु'च असलेल्या मानवाच्या टोळयांचे रुपांतर समाजात करणा-या नदयाच आहेत.  आपल्या कथां किंवा दंतकथ

ज्ञानदानाचा अपराध मी करीत नाही !

Image
एक दिवस सकाळचे कोवळे उनं खात लाओत्से आपल्या झोपडी बाहेर बसला होता.  दूरच्या गावातील एक माणूस त्याला भेटण्यासाठी आला.  त्याला जीवनासंदर्भात काही प्रश्न पडले होते.  लाओत्सेकडून आपल्या प्रश्नांची उत्तर मिळतील,या आशेने तो लाओत्सेकडे आला होता.  तो लाओत्सेला म्हणाला,"मला जगण्यात आनंद आणि सार्थक वाटेल,असा काही उपदेश द्या !" लाओत्सेने त्याच्याकडे पाहिले आणि हसला.  जीवनाच्या अथांग डोहात गंटागळया खाणारा तो माणूस मोठया आशेने त्याच्याकडे पाहत होता.  लाओत्से त्याला म्हणाला,"जो दुस-याच्या ज्ञानावर जगू इच्छितो तो आयुष्यभर भटकत आणि भरकटतच राहतो.  मी तुला तसा भटकणारा आणि भरकटणारा बनवू इच्छित नाही." लाओत्सेकडून ज्ञानप्राप्तीसाठी मोठया आशेने लांबवरुन आलेला हा गृहस्थ हिरमुसला झाला.  एक मात्र खरे की त्याला जीवनासंदर्भात काही मूलभूत प्रश्न पडले असल्याने, तो नक्कीच जिज्ञासू आणि बुद्धिमान होता. लाओत्सेचे बुचकळयात पाडणारे उत्तर ऐकून देखील तो म्हणाला," मी लांबच्या गावाहून आलो आहे  काही तरी ज्ञान मला द्या !"  लाओत्सेला त्याच्या ज्ञानतृष्णेची जाणीव झाली.  तसेच काही तरी दे

अमेरिकन भूमीवरचे अखेरचे युद्ध..

Image
२४ ऑगस्ट १८१४ चा दिवस होता.  ब्रिटिश आरमाराच्या युद्ध पोता 'चेस पीक' च्या खाडीत आग ओकत होत्या.  दुबळया अमेरिकन आरमाराची दाणादाण उडाली होती.  अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी. सी.  पर्यंत आरमार पोहचले.  समुद्राच्या लाटांसारखे तोफ गोळे वॉशिंग्टन डी. सी.  वर येऊन आदळत होते.  ब्रिटिश फौजा राजधानीत शिरल्या होत्या.  त्यांनी 'कॅपिटॉल हिल' नावाने ओळखले जाणारे, अमेरिकेचे संसद भवन जाळून टाकले.  त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवास स्थान असलेल्या 'व्हाईट हाऊस' कडे वळवला.  काही वेळातच व्हाईट हाऊसचे रुपांतर बर्निग हाऊस मध्ये झाले.  अमेरिकेचा गौरव असलेले व्हाईट हाऊस आणि कॅपिटॉल हिल हया दोन्ही ईमारती धडधडा जळत होत्या.  एवढी मोठी नामुष्की अमेरिकेच्या पदरात पडली होती.  अमेरिकने आपला सच्चा मित्र फ्रान्सला धोका देऊन ज्याविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध लढले. त्या इंग्लंडशी मैत्री करार केलेला होता.  असे असतांना देखील इंग्लंडच्या फौजा अमेरिकेच्या संसद भवन आणि राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान बेचिराख करतात.  हे समजून घेण्यासाठी आपल्याला सन १८०० मध्ये जावे लाग