Posts

Showing posts from May, 2021

शिर देईल पण धर्म..

Image
गुरू तेगबहादुरांसमोर हात जोडून उभे असलेले काश्मिरी पंडित त्यांची कैफियत मांडत होते.  'असे काय झाले आहे?' असा प्रश्न गुरूजींनी केल्यावर एक काश्मिरी पंडित सामोरा झाला आणि म्हणाला,' गुरूजी,आपण औरंगजेबाच्या हिंदू विरोधी राज्यकारभार पाहत आहातच.  त्याने काश्मिरमध्य नेमलेला आपला सुभेदार शेर अफगान याला एक हुकूमनामा पाठवला आहे.  त्यानुसार काश्मिरमध्ये राहणा-या हिंदुना धर्मांतरीत करुन मुसलमान बनण्याचा घाट घातला आहे.  त्याच्या हुकूमनाम्याने आमचे जगणे मुश्किल झाले आहे.  शीख गुरूंनी कायमच हिंदू धर्माचे रक्षण केले आहे.  म्हणूनच आम्ही आपण आमचे रक्षण करावे. अशी अपेक्षा आणि आशा घेऊन आलो आहोत.  आपण नक्कीच आमचे रक्षण कराल. असा आम्हांला विश्वास आहे.' काश्मिरी पंडितांचे हे निवेदन ऐकून तेगबहादुरजी गहन विचारात पडले.  औरंगजेब देशाचा शासक होता.  त्याने असा धर्मवेडेपणा करावा आणि आपल्या प्रजेत भेदभाव करावा हे त्यांना कदापि मान्य नव्हते. राजासाठी कायम राजधर्म महत्वाचा असतो,अन्य कोणताही धर्म नाही.  असे त्यांचे स्पष्ट मत होते.  गुरू नानकदेवांपासून जेवढे शीख गुरू झाले त्यांनी हिंदु-मुसलमा

‘हिन्द की चादर’ गुरू तेगबहादुर

Image
१६६५ साली 'बाबा बाकला' येथे गुरूगादीवर अभिष्कत झालेल्या गुरू तेगबहादुरांनी काही दिवस तेथेच वास्तव्य केले.  बाबा बाकला गावात तेगबहादुरजींनी एकूण  २६ वर्षे ९महिने आणि १३ दिवस निवास करुन तपश्चर्या केली होती.  तसेच याच ठिकाणी त्याां गुरूगादीवर अभिषिक्त करण्यात आले.  त्यामुळे शीख धर्म इतिहासात हे गाव 'बाबा बाकला साहेब' म्हणून अजरामर झाले.  अखेर तेगबहादुरजींनी आपल्या अनुयायांसह बाबा बाकलाचा त्याग केला.  ते अमृतसर येथे गेले.  अमृतसरच्या हरमंदिर साहेबच्या दर्शनासाठी देखील त्यांना संघर्षच करावा लागला.  हरमंदिर साहेबचा स्वयंघोषित पुजारी 'हरजी सोढी' याने त्यांना मंदिरात प्रवेश देण्यास नकार दिला.  कारण तेगबहादुरजींनी हरमंदिर साहेबचा ताबा घेतल्यास हरजी सोढी याला होणारी बक्कळ कमाई बंद झाली असती. तेगबहादुरजींना शीख समुदायाने बलपूर्वक हरमंदिर साहेबमध्ये प्रवेश करण्याची अनुमती मागितली; परंतु हे गुरूपरंपरेच्या विरोधात वर्तन ठरेल.  असे त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले. हा गोंधळ चालू असतांना  ते हरमंदिर साहेबच्या जवळ एका बोराच्या वृक्षाखाली बनवण्यात आलेल्या चबुत-यावर

स्वातंत्र्याची अस्वस्थ पहाट

Image
लॉर्ड कार्नवालिस आणि त्याच्या सैन्याने अमेरिकन क्रांती सेनेसमोर शरणागती पत्कारली.  ही बातमी इंग्लंडला पोहचली.  त्यामुळे लंडनच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली.  ब्रिटनचा सम्राट जॉर्ज तिसरा याला मान्य नसतांना देखील ब्रिटिश संसदेने शांतता आणि तहाची बोलणी प्रारंभ केली.  मेजर जनरल बेनेडिक्ट अर्नोल्ड याने आपण क्रांती सेनेला अजूनही पराभूत करू शकतो,अशी खात्री दिली असल्यामुळे राजाला युद्ध सुरु ठेवून विजय प्राप्तीची आशा होती; परंतु अखेर राजासह सर्वांना आपला पराभव मान्य करावा लागला.  अमेरिकेच्या क्षितीजावर स्वातंत्र्याची पहाट उगवली.  ही पहाट जशी आनंददायी होती,तशीच अस्वस्थ देखील होती.  गुलामाला स्वातंत्र्य मिळाल्यावर आता काय करावे ? कसे जगावे ? असे विविध प्रश्न सतावत असतात.  स्वतंत्र होण्यापूर्वी असलेली त्याच्या जीवनाची व्यवस्था किंवा चौकट मोडलेली असते. यातनामय असली तरी त्या चौकटीला त्याचे शरीर व मन सरावलेले असते.  हाताला बेडयांची सवय झालेली असते,मुक्त झालेले हात त्याला रिकामे-रिकामे वाटतात आणि डोळयासमोर एक मोठा शुन्य असतो.  पुन्हा शुन्यापासून सुरवात करायची असते ;परंतु आता त्याला स्वतःच्

हरणांच्या गावातला राजहंस

Image
गुरू हरकृष्णराय यांनी आपल्या निर्वाण समयी दोन-चार वेळा हात हलवून 'बाबा बाकले' नावाचा उच्चार केला.  यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. यासाठी बाबा बाकले ही काय भानगड होती,हे समजणे महत्वाचे आहे.  आजच्या अमृतसर जिल्हयात  'बाबा बाकला' नावाचे तालुक्याचे शहर आहे. आज यास बाबा बाकला साहिब असे संबोधतात.  या शहराचे खरे नाव 'बाक्कन-वाला' असे होते.  हे नाव फारशी भाषेतील असून त्याचा अर्थ 'हरणांचे शहर' (Town of Deer) असा होतो.  बाक्कन-वालाचा अपभ्रंश होऊन 'बाकला' असे झाले.  शीख धर्मपरंपरेशी त्याच्या संबंध आल्याने आज ते बाबा बाकला साहिब म्हणून ओळखले जाते.  गुरू हरकृष्णराय यांच्या 'बाबा बाकले' या अंतिम उच्चारणाचा अर्थ असा घेण्यात आला की शीखांना त्यांचा पुढील गुरू बाबा बाकले शहरात मिळेल.  शीख धर्माच्या अंतर्गत शत्रुंनी हरकृष्णरायजींच्या संदिग्ध संदेशात नेमकी संधी शोधली.  गुरू हररायजींचा धर्मद्रोही मुलगा रामराय आणि धीरमल यांनी स्वतःला गुरूगादीचे वारसदार म्हणून घोषित केले.  तसेच बाकला शहरात वास्तव्य करणा-या त्यांच्या सोढी घराण्यातील २२ लोकांनी गुरू

ध्वज विजयाचा उंच धरा रे !

Image
यॉर्क टाऊनच्या चेसापीक उपसागरात फ्रेंच नौदलाने रॉयल नेव्हीला पाणी पाजले.  त्याच्यवेळी एका उमदया तरूणाच्या नेतृत्वात अमेरिकन क्रांती सेनेने जमिनीवरील युद्धात धूळ चारली.  १४ ऑक्टोबर १७८१ रोजी रात्रीच्या किर्र अंधारात ब्रिटिशांच्या छावणीवर हल्ला करण्याची योजना आखली गेली.  त्याचवेळेस फ्रेंच सेना दुस-या एका ब्रिटिश छावणीवर चढाई करण्याच्या प्रयत्नात होता  अमेरिकन क्रांती सेनेची कमान असलेला युवा सेनानायक अत्यंत कल्पक होता.  त्याने ब्रिटिशांच्या छावणी नजीक पोहचल्यावर आपल्या सैन्याला बंदूकीतल्या गोळया काढून घेण्याचा आणि बंदूकांवर संगीन चढवण्याचा आदेश दिला. अनावधानाने एकही गोळी सुटल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती.  अमेरिकन क्रांती सेनेच्या नायकाकडे बलाढय ब्रिटिश सेनेशी लढण्यासाठी केवळ चारशे सैनिक होते.  तसेच त्याने ही जबाबदारी सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याकडे हट्ट धरून मिळवली होती.  त्यामुळे रणकौशल्याची चमक दाखवणे आणि विजय खेचून आणणे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचे होते.  यावरच त्याच्या भावी कारकीर्दीचा पाया रचला जाणार होता.  हा सेनानायक आपल्या अवघ्या चारशे सैनिकांच्या तुकडीला

'बाला' साहेब आणि बाबा बाकले

Image
गुरू हरगोविंदांनी तीन विवाह केले होते.  त्यांना पाच पुत्र व एक कन्या अशी अपत्ये झाली.  गुरूदित्ता,सूरजमल,अनीराय,बाबा अटल आणि तेगबहादुर अशी या पुत्रांची नावं होती.  हरगोविंदजींची पहिली पत्नी दामोदरी यांच्या पोटी १६१३ मध्ये 'गुरूदित्ता' यांचा जन्म झाला आणि दुसरी पत्नी नानकी यांच्या पोटी १६२२ मध्ये 'तेगबहादुर' यांचा जन्म झाला.  हरगोविंदांच्या पश्चात शीख गुरू परंपरेचा इतिहास या दोन व्यक्तींच्या भोवतीच गुंफलेला दिसतो.  आपल्यानंतर गुरूदित्ता यांनी गुरूगादी सांभाळावी अशी त्यांची ईच्छा होती.  मात्र गुरूदित्ता यांच्या जीवनप्रवाहाने वेगळे वळण घेतले.  एकदा हरगोविंदजी नानकदेवांचे पुत्र श्रीचंद यांच्या उदासी आश्रमात त्यांची भेट घेण्यासाठी गेले.  संत श्रीचंद यांनी त्यांचा सर्वात थोरला पुत्र गुरूदित्ता आपल्याला अर्पण करावा अशी ईच्छा व्यक्त केली.  त्यांची आज्ञा हरगोविंदजींनी प्रमाण मानत गुरूदित्ता यांना त्यांच्या स्वाधीन केले.  संत श्रीचंदांनी त्यांना आपल्या उदासी पंथाच्या गादीचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.  बाबा गुरूदित्ता आणि त्यांची पत्नी निहाल कौर यांना पुत्र प्राप्

लोहा गरम हैं, मार दो हथौड़ा..

Image
१७८१ सालचा ऑगस्ट महिना उजाडला आणि वेगवान घडामोडी घडू लागल्या.  अमेरिका आणि ब्रिटन यांच्यातील लढा आता निर्णायक अवस्थेत पोहचला होता.  त्याच बरोबर जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या सरसेनापती पदाची अंतिम परीक्षेला प्रांरभ झाला.  ब्रिटिश सेनेच्या घराचे वासे आता फिरले होते.  त्याला अंतिम व नेमक्या धक्क्याची आवश्यकता होती.  याचवेळी अमेरिकन क्रांतीसेनेचा सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन आणि फ्रेंच नौदलाचा ॲडमिरल काउंट दे ग्रास यांनी भूदल व नौदल यांच्या समन्वयातून एक जबरदस्त रणनीती आखली.  नवा ब्रिटिश सरसेनापती कॉर्नवालिस याने व्हर्जिनिया ताब्यात घेतल्याशिवाय युद्धाची समाप्ती अशक्य आहे.  हा विचार करून त्यानुसार डावपेच आखण्यास सुरवात केली होती.  युद्धाचे केंद्र आता व्हर्जिनिया होणार होते.  पुढील सर्व हालचाली व्हर्जिनियाच्या आवतीभोवती होणार होत्या.  त्यानुसार कॉर्नवालिसने कॅरोलीनाच्या उत्तरेला प्रस्थान केले आणि जनरल अर्नोल्डच्या तुकडीला जाऊन मिळाला.  अमेरिकन क्रांतीसेनेचा जनरल लाफाएट हा तेथे छोटशी तुकडी घेऊन आघाडी सांभाळत होता.  कॉर्नवालिसच्या विचारानुसार लाफाएट फार  तर फार गनिमी काव्याचा वापर करून,आपल