Posts

Showing posts from November, 2021

मातृसत्तेचा उपासक तत्त्ववेत्ता

Image
कन्फ्यूशियस चे शिक्षण पूर्ण झाले.  त्याचा मित्र राजकुमार मित्र 'नांगोंग जिंग्सू' आपल्या राज्यात परतला.  त्याला त्याच्या 'मेंग' राज्याची प्रशासकीय जबाबदारी सांभाळायची होती.  कन्फ्यूशियस देखील घरी परतला.  हया दोघा मित्रांच्या वाटा काही काळासाठी वेगळया झाल्या असल्या तरी ते जीवनभर सोबत असणार होते.  जिंग्सू हा कन्फ्यूशियसच्या जीवनाचा मुख्य आधार म्हणून अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडणार होता.  कन्फ्यूशियस घरी गेल्यानंतर काही दिवसातच त्याची आई झेंगझाईने वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.  आपल्या मुलाची महान कर्तबगारी पाहण्याचे सौख्य देखील हया मातेला लाभले नाही.  तिचे जीवन म्हणजे केवळ संघर्ष आणि दुःख यांची गाथा ठरले.  असे असले तरी कन्फ्यूशियसला त्याच्या आजोळच्या यान परिवाराने कधी अंतर पडू दिले नाही.  झेंगझाईनं आपल्या मृत्यूच्या काही काळ आधीच त्याचा विवाह तिच्या 'यान' परिवारातील एका मुलीसोबत निश्चत केला होता.  हया मुलीचे नाव 'जाई वो' असे होते.  त्यावेळी सतरा वर्षांच्या असलेल्या कन्फ्यूशियसला शिक्षणासाठी दिलेल्या वचनानुसार राजदरबाराची नोकरी

विमुक्त नंदनवनातील नरक

Image
१८४० साली ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रा. एच. मेरिव्हेल यांनी 'वसाहतीकरण आणि वसाहती' या विषयावर अनेक व्याख्याने दिली.  त्यांच्या व्याख्यानमालेत त्यांनी दोन महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आणि त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न देखील केला.  "लिव्हरपूल आणि मॅचेस्टर या दोन नगरांचे महानगरांमध्ये रुपांतर करण्याची किमया कोणी केली?आज तेथे जोमाने चालणारे उद्योगधंदे आणि प्रचंड वेगाने होणारा संपत्तीचा संचय कोणच्या जिवावर चालू आहे?....   इंग्रजांची आजची समृद्धी नीग्रोंचे श्रम आणि दुःखे यांवर आधरलेली आहे.... त्यांच्या गोद्या बांधण्याचे आणि वाफेची इंजिने तयार करण्याचे काम नीग्रोंनीच केल्यासारखा हा प्रकार आहे."  प्रा. एच .मेरिव्हेल यांचे हे विधान अत्यंत महत्वाचे होते.  अमेरिकेतील आपल्या वसाहतींमध्ये नीग्रोंना जनावरांपेक्षा वाईट वागणूक देऊन इंग्लंडची समृद्धी मोहरली होती.  ३१ ऑगस्ट १६१९ रोजी व्हर्जिनियाच्या किना-यावर २० नीग्रो गुलाम विकण्यासाठी आलल्या जहाजाने नांगर टाकला.  हया नांगराने समुद्रात जहाजाला स्थीर करण्याबरोबरच पुढील सुमारे २५० वर्षांसाठी नीग्रो वंशातील लाखो निष्पाप जीवांन

जगण्याच्या संघर्षातील विद्यार्जन

Image
आयुष्याच्या भावी वाटचालीसाठी आवश्यक मूलभूत ज्ञानाची शिदोरी कन्फ्यूशियसला आपल्या आजोळात प्राप्त झाली होती.  हया मूलभूत ज्ञानप्राप्तीमुळे अमर्याद ज्ञानाच्या क्षितीजाकडे जाणा-या वाटा आता त्याला खूणवू लागल्या होत्या.  तो आता एक उंच व सुदृढ किशोर झाला होता.  आपल्या मामांसोबत तो शेतीमध्ये राबत होता.  'यान' परिवार अल्पभूधारक असल्याने वराह पालनाच्या पूरक व्यवसायावर त्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने अवलंबून होती.  कुटुंबासाठी आवश्यक धान्य,भाज्या,कापूस इत्यादींचे उत्पादन शेतीतून घेतले जात असे.  शेतात पिकलेल्या कापसातून परिवारासाठी आवश्यक वस्त्र घरीच विणले जाई.  कन्फ्यूशियस हया प्रत्येक कामात समरसून भाग घेत होता.  सतत कामात राहणे त्याला आवडत असे.  त्याने आपल्याला कराव्या लागणा-या परिश्रमासाठी गरीबीला कधीच जबाबदार धरले नाही.  हया कामांमधून सतत क्रियाशील राहण्याचे संस्कार त्याने आजीवन स्वीकारले.  असे असले तरी त्याची माता झेंगझोईला किशोरावस्थेत प्रवेश केलेल्या आपल्या मुलाची चिंता वाटू लागली. ज्ञानाची महती ज्ञात असल्याने ज्ञानाच्या बळावरच आपला मुलगा द्रारिद्रयाच्या तटबंदया तोडून एक

गो-यांच्या इतिहासातील काळा अध्याय

Image
कल्पना करा की सायन्स फिक्शननी लोकप्रिय केलेली 'टाईम मशिन' ही कल्पना वैज्ञानिकांनी प्रत्यक्षात उतरवली आहे. त्यानुसार प्रत्येकाला त्याच्या स्वप्नातील नगरीच्या भूतकाळात जाण्याची संधी मिळणार आहे.  अशावेळी आपल्यातील अनेकांना भूतकाळातील पॅरिस नगरी पाहण्याची ईच्छा होऊ शकते.  आजचा माणसाला 'स्वप्न नगरी' ते 'फॅशन पंढरी' अशा विविध कारणांनी पॅरिसचे आकर्षण असलेले दिसते.  टाईम मशिनमधून एखादा पॅरिसप्रेमी माणूस १६३० सालच्या पॅरिसमध्ये पोहचला, तर त्याच्या स्वप्नातील पॅरिसच्या झगमगाटाने भरलेल्या रस्त्यांवरून मजेत भटकंती करण्याऐवजी त्याला भिका-यांच्या गर्दीतून वाट काढत फिरावे लागेल.  कारण १६३० साली पॅरिसमधील लोकसंख्येच्या एकचतुर्थांश लोक भिकारी होते आणि फ्रांसच्या ग्रामीण भागातही हीच अवस्था होती.  सोळाव्या-सतराव्या शतकात सगळा युरोपच भिका-यांनी भरलेला होता.  असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.  इंग्लंड असो वा हॉलंड. सर्वत्र भिका-यांचा महापूर लोटला होता.  अनेकांचे स्वप्न असलेल्या  स्वित्झर्लंडमध्ये सोळाव्या शतकात कंगाल बेघर लोकांच्या टोळया राहत्या घरांना घेरून लुटण्याचा प्र

आजोळची शिदोरी..

Image
आपल्या आयुष्यातील सगळयात मोठे दुःख कोणते ? असा प्रश्न कोणालाही सहज केला,तर मोठी गंमत पाहायला मिळते.  प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील दुःखाचा शोध घेण्यासाठी भूतकाळाच्या डोहात सूर मारू लागतो.  जगातील इतर लोकांपेक्षा मी जे भोगलं ते सगळयात वेदनादायक-कष्टप्रद होते,हे समोरच्याला पटवून देण्यासाठी तो आपले सगळे शब्द सामर्थ्य पणाला लावतांना दिसतो.  त्याच्या कथनातून वा वर्णनातून समोरचा कधीच दुःखी होत नसतो,हे मानसशास्त्रीय सत्य कोणी कबूल करत नाही.  कारण माणसाने आपल्या जीवनाचा सारा डोलाराच असत्याच्या पायावर उभा केलेला आहे.  खरं सांगायचे झाल्यास माणसाच्या दुःखाचे सगळयात मोठं कारण एखादी व्यक्ती,मानवी प्रवृत्ती,परिस्थिती,घटना,प्रसंग इत्यादी पेक्षा अत्यंत भीन्न असलेले दिसते.  हे कारण असते त्याचे भूतकाळात रमणे आणि भविषकाळासाठी झुरणे.  माणूस वर्तमानात जगण्यास तयारच नाही.  त्यामुळे तो सुखी होऊ शकत नाही.  भगवान बुद्धांनी यासाठीच वर्तमानात जगण्याचा संदेश दिला होता.  मात्र भूतकाळाला कवटाळून बसणा-या आणि भविष्यासाठी तळमळणा-या माणसाला आजही वर्तमानात जगण्यात अर्थ वाटत नाही.  येणारा प्रत्येक क्षण हा भूत