Posts

Showing posts from September, 2020

शापितांची संजीवनी

Image
  सन १६१० साली एक जहाज जेम्स नदीकिनारी वसलेल्या जेम्स टाऊनला पोहचले . अशी भयान , विराण आणि निर्मनुष्य वस्ती म्हणजेच जेम्स टाऊन आहे . यावर जहाजातील इंग्रंज प्रवाशांचा विश्वास बसत नव्हता . वस्तीत उभे असलेले चर्च त्यांना दिसले . चर्चचा घंटानाद करावा , जेणे क रु न येथे कोणी जिवंत माणूस असल्यास तो आपल्या पर्यंत येईल . अशा विचारातून त्यांनी चर्च बेल वाजवण्यास सुरवात केली . ब-याच वेळानंतर काही भयग्रस्त चेहरे चर्चच्या प्रांगणात नजरेने अंदाज बांधत प्रकट झाले . अर्धनग्न व भूकेने व्याकूळ ६० जेम्स टाऊनवासीयांनी आपल्या देशबांधवानां ओळखले . जेम्स टाऊनच्या नरकयातनांमधून सुटकेचा किरण दिसताच . त्यांचे काळवंडलेले चेहरे उजळले . अनेक दिवसांच्या उपासमारीने अर्धमेले झालेल्या या लोकांच्या पायात एक नवीन बळ संचारले . त्यांनी आपल्या देशबांधवांकडे धाव घेतली . त्यांची हकिकत ऐकून नव्याने जेम्स टाऊनमध्ये प्रवेश केलेले त्यांचे देशबांधव सुन्न झाले . जॉन स्मिथच्या अथक प्रयासामुळे जेम्स टाऊनने बाळसे धरले होते . स्थानिक जमातींशी सौहादर्यपूर्ण संबंध प्रस्थापित झाल्याने जीवाचे भय संपले आणि अन्नाचीही भ्रांत क

श्रमण परंपरेचा चिरंतन प्रवाह

Image
भारतीय संस्कृती अतिप्राचीन काळापासून आदान-प्रदानाची संस्कृती असलेली दिसते. विविध वंश,संस्कृती व धर्मपरंपरा यांचे अभिरसरण म्हणजे आजची भारतीय संस्कृती. बौद्ध-जैन या परंपरा अनार्य व अवैदिक तर आहेतच, मात्र प्राग्वैदिक काळातील द्रविड व इतर मूलनिवासी समाजाशी नाते सांगणा-या आहेत. द्रविड,नाग,मुंडा शबर,ठाकूर,निषाद इत्यादी अनार्य समाजांशी आर्यांचा संघर्ष व समन्वय हा अतिशय गुंतागुंतीचा इतिहास आहे. जैन धर्मातील आचार्यांनी सदैव आपण अनार्य असून क्षत्रिय आहोत हे सांगितलेले दिसते. तसेच आपल्या धर्मपरंपरेचे अस्तित्व प्राग्वैदिक काळापासून असल्याचा दावा केला. बौद्ध-जैन धर्मपंरपरांमधील पुनर्जन्म,कर्मवाद आणि मुक्तीचा प्रयत्न या अहिंसावादाच्या द्योतक आहेत. त्याचप्रमाणे आर्यांच्या यज्ञप्रधान तत्त्वज्ञानाशी या तीन गोष्टी जुळणा-या देखील नाहीत. उत्तर वैदिक काळात यज्ञविरोधी क्षत्रियतत्त्वज्ञानाचा विकास होऊ लागला. तेंव्हा आर्यांनी ही तत्त्वे आपल्या धर्मात पण गोवली असावीत,असे काही अभ्यासकांचे मत आहे. अवतारवादाची संकल्पना आर्यांकडून बौद्ध-जैन या सुधारणावादी तत्त्वज्ञानात आली असावी. अवतारी पुर

शापित जेम्स टाऊन आणि बायबलचे वचन

Image
लाखो-हजारो वर्षांच्या कालचक्रात  मानवची उत्क्रांती होत गेली. मानव कसा निर्माण झाला ? आजच्या मानवापर्यंत तो कसा उत्क्रांत होत आला? अशा अनेक मानव उत्क्रांतीशी केंद्रित प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न जगात सतत सुरू असलेला आपण पाहतो. यासंदर्भात विविध सिद्धांत सदैव मांडले जातात. एक सजीव म्हणून मानव प्रजातीची उत्पत्ती- उत्क्रांती याविषयी आजही सर्वमान्य एकच असा सिद्धांत सांगता येत  नाही. एक प्रजाती म्हणून मानवाविषयीचे हे  गूढ जसे कायम आहे. तसेच या मानवाच्या मनातील एका गूढाचा शोध देखील हजारो वर्षांपासून सतत सुरू आहे. हे गूढ म्हणजे त्याच्या मनातील मोह किंवा हव्यास. मानवी मनातील हे गूढ उकलण्याचा प्रयत्न अनेक संत-महात्म्यांनी केला. जगात जे काही वाईट वा अमंगल घडते , त्याचे मूळ म्हणजे मोह. मानवी जीवनातील दुःखाचा उगम म्हणजेही मोह. रामायण अथवा महाभारत घडण्याचे कारण देखील मोहच. अशा मोहाचा सखोल शोध सर्व संत-महात्म्यांनी घेतला. त्यांच्या सर्व संशोधनातून ' मोहत्याग करा ' एवढाच संदेश ते देऊ शकले. त्यांचा संदेश प्रत्येकाने ऐकला , त्यांना महान मानले , त्यांची पूजा केली इत्यादी इत्यादी. असे बरेच

मूलनिवासींचे कालजयी हुंकार 'बुद्ध –महावीर'

Image
प्राग्वैदिक काळापासून जैन-बौद्ध धर्माची विचारधारा भारतीय मातीत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात असलेली दिसते. जैन-बौद्ध धर्मपरंपरांची पाळमुळं आर्यांच्या आगमनापूर्वी भारतीय उपखंडात रूजलेली होती. सर्वसामान्य माणूस भगवान बुद्ध अथवा भगवान महावीर यांच्यापासून या दोन्ही धर्मांचा उगम झाला,असेच मानतो. मात्र बौद्ध असो वा जैन हे केवळ धर्म नाहीत. हे अत्यंत प्राचीन,समृद्ध आणि संपन्न अशा एकाच संस्कृतीच्या समांतर धारा आहेत. त्यांचा उगम शोधण्यासाठी आपल्याला बुद्धांच्या आणि महावीरांच्या खूप मागे जावे लागते. यासाठी सर्वप्रथम बौद्ध व जैन यांच्यातील दृष्य भेद काही काळ बाजूला ठेवावे लागतात. बुद्ध व महावीर हे समकालीन असल्याने त्यांचे तत्त्वज्ञान व जीवनदृष्टी यांच्यात श्रेष्ठ-कनिष्ठ ठरविण्यासाठी अनुयायांमध्ये स्पर्धा लागली होती. या दोन्ही महापुरुषांमध्ये ही स्पर्धा नव्हती. हे दोघेही सगळयाच्या पल्याड पोहचले होते. इतिहासाच्या क्रूर जात्यात भरडल्या गेलेल्या भारतीय मातीच्या मूलनिवासी समाजाचे प्रचंड सामर्थ्यशील हुंकार म्हणजे भगवान बुद्ध आणि भगवान महावीर. या समाजाचे सर्वांगिण कल्याण

अमेरिकेच्या पायातील भांडवलशाही...

Image
इंग्लंडमध्ये एलिझाबेथ प्रथम सारख्या कर्तृत्त्वान महाराणीच्या निधनानं,एका पर्वाचा अंत झाला. स्टुअर्ट घराण्याकडे राजसत्ता आल्यानंतर काही काळ यादवी व हुकुमशाहीचा अनुभव इंग्लंडने घेतला. स्टुअर्ट घराण्याचा पहिला राजा जेम्स प्रथम सत्तारूढ झाला. तोपर्यंत अमेरिकन भूमीवर इंग्रंज नावाला देखील नव्हते. एलिझाबेथच्या काळात इंग्लंडची नावीक शक्ती प्रचंड वाढली होती. असे असले तरी,समुद्रावर छापे मारणे आणि जहाजांची लूट करून संपत्ती प्राप्त करणे. एवढाच हेतू राजसत्तेने महत्वाचा मानला होता. हॉकिन्स,ड्रेक आणि रॅले सारखे एलिझाबेथचे आवडते लोक स्पॅनिश जहांजाना लूटने किंवा नीग्रो गुलामांचा व्यापार याच्यात संतुष्ट होते. त्यांच्यामध्ये साहस व शौर्य यांची कमी होती,असे मुळीच नाही;परंतु अपर्याप्त साधनांमुळे त्यांना असे करण्याशिवाय पर्याय नव्हता. एलिझाबेथने त्यांना प्रोत्साहन दिले. महाराणी म्हणून तिचे हे कृत्य बेकायदेशीर व अमानवी होते. हे मान्य केले, तरी संपत्तीची निर्मिती आणि त्यातून नावीक शक्ती प्रबळ करण्यासाठी दुसरा पर्याय इंग्लंडकडे उपलब्ध नव्हता. तसेच त्याशिवाय स्पेनच्या समुद्री महासत्तेला आव्हान देणे

जेम्स टाऊन व्हाया मार्टिन लूथर...

Image
मार्टिन लूथर या जर्मन  प्राध्यापक व धर्मगुरूने युरोपिअन धर्मक्रांतीचा उद्घोष केला. सन १५१७ मध्ये लूथरने धर्मसुधारणांचा जाहिरनामा प्रसिद्ध करून,युरोपातील प्रबोधन कालखंडाचा नारळ फोडला. पोप व चर्च यांच्या दमनकारी सत्तेला त्यानं दिलेल्या आव्हानामुळे युरोपचे भाग्य सर्वाथानं बदलेले. मार्टिन लूथर ना तत्त्वज्ञ होता,ना धर्मपंडित,तरी त्याच्या धर्मसुधारणांच्या विचारांचा प्रभाव अखंड युरोपवर पडला. कॉल्विनसारख्या अनेक धर्मसुधारकांनी लूथरकडून प्रेरणा घेतली. प्रोटेस्टेंट ख्रिश्चन या  नव्या ख्रिश्चन पंथाचे जनकत्व लूथरकडेच जाते. सनातनी व सुधारक ख्रिश्चनांची विभागणी अनक्रमे कॅथोलीक व प्रोटेस्टेंट अशी झाली. मार्टिन लूथरची ही धर्मक्रांती आजच्या अमेरिकेच्या निर्मितीतील एक प्रमुख कारणांपैकी एक आहे. युरोपातील ईतर राजसत्तांपेक्षा इंग्लंडच्या राजसत्तेने धर्मक्रांतीचा नेमका लाभ उठवला. इंग्लंडमधील धर्मक्रांतीला पेटवण्याचे काम धार्मिक नेत्यांपेक्षा तेथील सम्राटांनीच केले. सन १४८५ मध्ये हेन्री सप्तमच्या रूपाने टयुडोर वंशांची सत्ता इंग्लंडवर स्थापन झाली. हेन्रीसारख्या अत्यंत धोरणी राजाने धर्मक्रांतीत पोप

प्राचीन तीर्थंकर परंपरा आणि महावीर

Image
मध्यमपावाची धर्मपरिषदेत कैवल्याज्ञानी भगवान महावीरांनी पारंपरिक वैदिक धर्माला आव्हान दिले. अकारा वैदिक पंडित आणि त्यांच्या ४४०० शिष्यांनी त्यांच्याकडून प्रव्रज्या स्वीकारली. ही घटना जैन परंपरेचा एक संस्थात्मक धर्म म्हणून उद्घोषच होता. मात्र जैन साहित्य व इतिहास यांचे अवलोकन केले असता,महावीरांच्या फार पूर्वीपासून जैन परंपरा अस्तित्वात होती. अशी मांडणी सातत्याने जैन अभ्यासकांनी आणि तशीच काही विदेशी अभ्यासकांनी केली आहे. जैन परंपरा आपल्या अतिप्राचीनत्वाचा जो दावा करते. त्याच्यासाठी या परंपरेने दिलेल्या प्रमाणांचा आढावा घेणे आवश्यक ठरते. महावीरांना जैन धर्माचे २४ वे आणि अखेरचे तीर्थंकर मानले जाते. तीर्थंकर ही संकल्पना यासाठी पाहावी लागते. जैन धर्माच्या ऐतिहासिक धारणेप्रमाणे कालचकाचे दोन भाग करण्यात आले आहे. पहिला म्हणजे क्रमशः विकसित होत जाणारा म्हणजेच उत्सर्पिणी काल आणि दुसरा म्हणजे क्रमशः -हास होत जाणारा म्हणजेच अवसर्पिणी काल. कालचक रथाच्या चाकाप्रमाणे खालून वर आणि वरून खाली म्हणजेच अवनतीकडून उन्नतीकडे आणि उन्नतीकडून अवनतीकडे फिरत असते. सहा अवसर्पिणी व सहा उत्सर्प

अमेरिकन भूमीवर युरोपिअन वसाहती...

Image
अमेरिकेच्या भूमीवर युरोपिअन वसाहती स्थापन्यास कोलंबसापासून सुरवात झाली. व्यापारवृद्धी हा अमेरिकेच्या भूमीवर जाण्यासाठी आसुसलेल्या प्रत्येक युरोपिअन देशाचा एकमेव हेतू होता. नव्याने शोध लागलेल्या या भूमीवरील देशांशी व्यापारीसंबंध स्थापन करावेत,अशी कल्पना मनात ठेवून युरोपिअन लोक या भूमीवर पोहचले. येथे पोहचल्यावर मात्र त्यांना उमगले की,या भूमीवर कोणा एका राजाचे सार्वभौम असे राज्य नाही. एवढेच काय राष्ट्र वा देश वा राज्य अशी संकल्पनांशी अत्यंत आदिम अवस्थेत असणारा मूलनिवासी अमेरिकन समाज अनभिज्ञ आहे. काही इतिहासकारांनी अमेरिका खंडावर वर्चस्व स्थापन करण्यात यश प्राप्त केलेल्या युरोपिअन लोकांचा इतिहास अधिक काळा करण्यासाठी वेगळेच चित्र रंगवले. त्यांच्यानुसार स्पॅनिश लोक जेंव्हा अमेरिका खंडावर पोहचले,तेंव्हा या  भूखंडावर अति सभ्य व सुसंस्कृत मानवी समाजाचा रहिवास होता. त्यांचे अनेक साम्राज्यं अस्तित्वात होती. समृद्धी आणि संपत्ती यांची तूलना करता, हे लोक युरोपिअनांशी कोणत्याच बाबतीत कमी नव्हते. स्पॅनिश लोकांच्या संहारक शक्तीसमोर ते टिकू शकले नाही. स्पेनने त्यांचा पराभव करून ही भूमी बळकाव