Posts

Showing posts from August, 2020

ऋजुवालुकेच्या तीरावरचा सूर्योदय

Image
  इसवी सन सहाशे वर्षांपूर्वीची मगध देशातील मध्यमपावा नगरी एक धार्मिक केंद्र म्हणून प्रख्यात होती. संस्कृती व वैदिक पंडित यांचे तर ते एक तीर्थस्थळच झाले होते. अशा मध्यमपावा नगरात सोमिल नामक एक धनाढय ब्राहमण राहत होता. त्याने एका विशाल महायज्ञाचे आयोजन केले. हा महायज्ञ केवळ मगध देशातच नव्हे , तर संपूर्ण उत्तर भारतात चर्चेचा व आकर्षणाचा विषय ठरला होता . उत्तर भारतातील सर्व वैदिकांना अशा महायज्ञात सहभागी होण्याचा मोह अनावर झाला होता. मोठ-मोठया नगरांपासून छोटया-छोटया खेडयांपर्यंत महायज्ञ ज्ञाची वार्ता पोहचली. हजारोंच्या संख्येने स्त्रीपु रु ष या महायज्ञाच्या पवित्र यज्ञज्वालेचे दर्शन घेण्यासाठी मध्यमपावेच्या दिशेन निघाले. पूर्व भारतातील अकारा दिग्गज विद्वान आपल्या ४४०० शिष्यांसह या महायज्ञात सहभागी झाले होते. याव रू न सामान्यजन किती प्रमाणात तेथे उपस्थित असतील , याची कल्पना आपण येवू शकते. महायज्ञाच्या अनुभूतीत बुडालेल्या श्रद्धाळूं चे भाग्य जोरावर होते. पवित्र यज्ञज्वालेसह त्यांना ऋ जु वा लु का नदीच्या तीरावर उदय पावलेल्या त्रिकालजयी ज्ञानसूर्याचे दर्शन व मार्गदर्शन लाभणार हो

पारंपरिक उच्च शिक्षणासमोर 'स्वायत्तते' चा चकवा

Image
पारंपरिक उच्च शिक्षणासमोर ' स्वायत्तते ' चा चकवा '' भविष्यात ज्ञानाधिष्ठित समाजच जगातील इतर सर्व समाजांमध्ये श्रेष्ठ ठरेल . जगातील गरीब देश ही संकल्पना हद्दपार होऊन , प्रत्येक देशाची शिक्षण व्यवस्था ही त्या देशाच्या समृद्धिचे मूल्यमापन करणारे परिमाण असेल . '' हे जगद्विख्यात व्यवस्थापन गुरु व लेखक पीटर ड्रकर यांचे विधान विश्वगुरु आणि महासत्ता होऊ पाहणा-या भारताने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे . कोणत्याही देशाला महासत्ता म्हणून जगात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी जे निकष सांगितले गेले आहेत , त्यामध्ये त्या देशाची शिक्षण व्यवस्था हा सर्वप्रथम निकष मानण्यात आला आहे . आज जगात महासत्ता म्हणून एकछत्री राज्य असणा-या अमेरिकेचा सकल राष्ट्रीय उत्पन्नातील १३% भाग हा शिक्षणासाठी खर्च केला जातो . त्यांचे सकल राष्ट्रीय उत्पन्न २१ ट्रिलियन डाॅ लर आहे . ४ . ट्रिलियन डॉलर चे राष्ट्रीय उत्पन्न असणारा चीन शिक्षणावर त्यातील ९% पेक्षा अधिक खर्च करत आहे . असे असतांनाही हे देश आपल्या शिक्षण व्यवस्थेवरील खर्चाबाबत समाधानी ना ही त , यापेक्षा अधिक खर्च केला जावा अशी त्यांची अपेक्ष

अमेरिकन भूमी बळकावण्याची स्पर्धा...

Image
कोलंबसाने   भारतीय उपखंडाकडे जाण्याच्या समुद्री मार्गाचा शोध लावण्याच्या नादात , आशिया-युरोप यांच्यासाठी पूर्णपणे अज्ञात अशा भूखंडाकडे जाण्याचा मार्ग शोधला. त्यालाच भारत समजून त्याने आणखी तीनदा या भूमीला भेट दिली. पंधराव्या शतकाच्या अस्तकाळात कोलंबसाच्या माध्यमातून काही स्थायी स्व रू पाच्या स्प ॅ निश वसाहती या भूमीवर स्थापन झाल्या. कोलंबसानंतर युरोपातील अनेक दर्यावदींनी या भूमीच्या वेगवेगळया भागाचे दर्शन घेतले. त्यांच्या स फ रींनंतर कोलंबस ज्या भूमीला भारत संबोधत होता , ती भारताची भूमी नाही हे त्यांना उमगले. हा आपल्याला पूर्णपणे अज्ञात असा भूखंड आहे , याची जाणीव पक्की झाली. हाच युरोपिअन देशांमध्ये हया भूखंडावरील अधिकाधिक भूमी बळकवण्याच्या जीवघेण्या स्पर्धेचा आरंभबिंदू ठरला. कच्चा माल , खनिज संपत्ती , व्यापारवृद्धी इत्यादी कारणांनी ही स्पर्धा अत्यंत तीव्र होत गेली. हे पंधराव्या शतकाचे अखेरचे दशक होते.   स्पेन , पोर्तुगाल ,फ्रांस, इटली या देशांनी अमेरिका खंडाला पादा क्रांत करण्यात आघाडी घेतली. याकाळात इंग्लंड मात्र या स्पर्धेत खूप मागे होता. याला कारण तत्कालिन इंग्लंडची राजस