Posts

Showing posts from May, 2019

संकल्पनेतील धर्म

Image

आणि बुद्ध हसत आहे.

Image
   इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात असलेली गणराज्यात्मक लोकशाही व्यवस्था ध्वस्त करु   पाहणा-या साम्राज्यवादी शक्तींना बळकटी प्राप्त होऊ लागली. भौतिक , सामाजिक , राजकीय व वैचारिकदृष्टया संपन्न अशी ही गणराज्यं ' विनाशकाले विपरित बुद्धी ' या उक्तीनुसार आपापसात संघर्ष करत , साम्राज्यवादी एकाधिकारशाही प्रवृत्तीला बळी पडत होती. दुस-या बाजूला तत्कालीन वैदिक धर्म स्वतःच्या निर्माण केलेल्या अभेद्य तटबंदयांमध्ये अडकून पडला होता. धर्म म्हणजे कर्मकांड आणि समाज म्हणजे न बदलता येणारी जातीय उतरंड असा समज वैदिक धर्ममार्तडांनी दृढमुल केला होता. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस भरडला जात होता. एकूणच राजकीय असो वा धार्मिक अशा दोन्ही स्तरांवर क्रौर्य , व्यभिचार आणि अविवेक यांनी समाजाला ग्रासले असतांना ,' करु णा-शील-प्रज्ञा ' हा महामंत्र देणा-या भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. कपिलवस्तूच्या या शाक्यवंशीय राजपुत्राने जगातील पहिल्या विश्वव्यापक अशा बौद्ध धर्माची स्थापना केली. अलौकिक , काल्पनिक , अगोचर , कुट व गुढ संकल्पनांची मांडणी म्हणजे धर्मसिद्धांत आणि त्यांचा काथ्याकूट

Raskin Bond

Image

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त दैनिक सार्वमत मध्ये प्रसिद्ध झालेला लेख"कृष्णाकाठचा कल्पवृक्ष"

Image
                                    कृष्णाकाठचा कल्पवृक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते देशाचे उपपंतप्रधान असा अत्यंत यशस्वी राजकीय आलेख असलेल्या आणि महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर आपला अमिट ठसा उमटवलेल्या एका नेत्याचे निधन होते. त्याने आपल्या मागे ठेवलेल्या संपत्तीची मोजदाद केली जाते. तेंव्हा आश्चर्याचा धक्का बसतो. वडिलोपार्जित काही गुंठे जमिन आणि बँकेच्या खात्यात केवळ पंधरा हजार रूपयांची शिल्लक एवढेच ऐहिक संचित मागे ठेवलेला हा नेता म्हणजे आधुनिक महाराष्ट्रच नव्हे तर आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक स्व.यशवंतराव चव्हाण. आज हे सत्य कपोलकल्पित कथा वाटेल. हे सत्य या महाराष्ट्राने साक्षात अनुभवले आहे. वर्तमान राजकारण आणि राजकीय नेतृत्व यांचा भयाण अनुभव घेणा-या आजच्या युवापिढीला यावर विश्वास बसणे अशक्यच आहे. आर्थिक व शैक्षणिक अशा दोन्ही स्तरावर प्रतिकुल परिस्थितीत जन्मलेला हा मुलगा जीवनाच्या संघर्षात संकटांवर स्वार झाला. आपण प्रयत्नपूर्वक आपले व्यक्तिमत्व घडवायचे अशी खुणगाठ मनाशी बांधून परिश्रम करू लागला. शाळेत शिक्षकांनी,'मोठेपणी आपण कोण होणार ?.' या प

धर्म चिंतन

Image